Devendra Fadnavis: पोलीस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चौकशी सुरु आहे. चौकशीसाठी बीकेसी सायबर पोलीस पथक फडणवीस यांच्या घरी पोहोचले आहे. फडणवीस यांच्या चौकशीविरोधात भाजप आज राज्यभर आंदोलन करणार आहे. यावरूनच आता राज्यातील महाविकास आघाडी सरकाराच्या मंत्र्यांनी भाजपाला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या चौकशी करण्यात आली, तेव्हा भाजप इतकी आक्रमक का झाली नाही, असा प्रश्न सरकारमधील काही मंत्र्यांनी केला आहे. यावरच बोलताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत की, ''देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस केवळ माहिती घेणार आहेत, त्याचा इतका गोंधळ करायची काय गरज आहे?'' फडणवीस यांच्यावर निशाणा साधत छगन भुजबळ म्हणाले आहेत की, ''ईडी, आयकर विभाग, केंद्रीय तपास यंत्रणा यांचा वापर करता आणि इथं पोलिसांनी साधी माहिती घ्यायची नाही का?'' 


काही लोक स्वतःला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? : संजय राऊत 


देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीवरून सुरु असलेल्या गदारोळावरती शिवसेना नेते आणि खासदार यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?'' 


 






 


दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब नंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलंय. विशेष म्हणजे फडणवीस यांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटीस नंतर भाजप आक्रमक झाली असून आज राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केल जातय. नाशिकच्या एन डी पटेल रोडवर भाजपच्या मुख्य कार्यालयाबाहेर आमदार देवयानी फरांदे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन नोटीसीच्या प्रतिची होळी करण्यात आली. तर डोंबिवलीमध्ये देखील भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नोटीस जाळून निषेध नोंदवला.


महत्त्वाच्या बातम्या: