Manoj Jarange on Devendra Fadanavis: आम्हाला 13 तारखेपर्यंत आरक्षण न मिळाल्याचा दोष सरकारला देऊन उपयोग नाही. सरकारवरचा आमचा विश्वास उडाला आहे असं मी कधीही म्हटलं नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील, असा आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलाय.


दरम्यान, अजित पवार यांच्या पक्षाचे दोन-तीन पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करत असल्याचा आरोप करत २० तारखेला आमरण उपोषणा सोबत 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे या निर्णयाची तारीख जाहीर करणार असल्याचे देखील ते म्हणाले.


२० तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराजे देसाई यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दोन महिन्यांचा अवधी मागितला होता. मात्र, जरांगे यांनी एका महिन्याची मुदत देत सरकारला 13 जुलैपर्यंत निर्णय घेण्यासाठीची मुदत दिली होती. ती मुदत आता संपली असून मनोज जरांगेंनी 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली . 


आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव ?


मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीस बाकीच्या मंत्रांवर दबाव आणत असतील असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला असून  काही मंत्री मराठ्यांवर अन्याय करत असल्याचेही ते म्हणाले. 


मराठ्यांना आरक्षण कसे मिळवून द्यायचं ते आम्ही बघू - जरांगे यांचा इशारा


अजित पवार गटाचे दोन-तीन पालकमंत्री मराठा समाजाच्या विरोधात षडयंत्र करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. 13 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळाला नाही. ते कसं मिळवायचं ते आता आम्ही बघतो असा इशाराही मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.


मंडळ कमिशन बरखास्त होऊ शकतं


सरकारने मला उघड पडायचा प्रयत्न केलाय. याला एक तर बदनाम करा नाहीतर घातपात करा. सरकार मला काय घात पात करेल. मला जो मारायला येणार आहे, त्याने फक्त मी जागं असल्यावर यावं, एका बुक्कीत दात पाडेन. मंडल कमिशन बरखास्त होऊ शकत, पण मला ओबीसींच वाटोळं करायचं नाही, असेही जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील भाषणातून म्हटले. 


हेही वाचा:


20 तारखेला पुन्हा उपोषण, त्याच दिवशी मोठी घोषणा; मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा संभाजीनगरमध्ये समारोप