Lok Sabha Election Voting 2024 : नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान (Lok Sabha Election Phase 5 Voting) होणार आहे. देशातील एकूण 6 राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशात 49 जागांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. महाराष्ट्रातला (Maharashtra Lok Sabha Voting 2024) हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल. मुंबईतील (Mumbai Lok Sabha Election 2024) सर्व सहा मतदारसंघ, ठाणे (Thane Lok Sabha Election 2024), कल्याण (Kalyan Lok Sabha), भिवंडी (Bhiwandi Lok Sabha), नाशिक (Nashik Lok Sabha), दिंडोरी (Dindori Lok Sabha) आणि धुळे (Dhule Lok Sabha) या 13 जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिहिर कोटेचा, अरविंद सावंत, अनिल देसाई, उज्ज्वल निकम, अमोल कीर्तिकर, पियुष गोयल, वर्षा गायकवाड अशा दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे.


देशभरातील 49 जागांसाठी मतदान 


लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या फेरीत 4.26 कोटी महिला आणि 5,409 तृतीयपंथी मतदारांसह 8.95 कोटीहून अधिक लोक मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात निवडणुका पार पाडण्यासाठी 9.47 लाख मतदान अधिकारी 94,732 मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. ज्या जागांवर मतदान होत आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील 13, उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालमधील सात, बिहारमधील पाच, झारखंडमधील तीन, ओडिशातील पाच, जम्मू-काश्मीरमधील एक आणि लडाखमधील एकमेव जागा आहे. विशेष म्हणजे, सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाचव्या टप्प्यात सर्वात कमी जागांवर मतदान होणार आहे.


भाजपसाठी आजचा टप्पा सर्वात महत्त्वाचा 


भाजपसाठी लोकसभेचा पाचवा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं मानलं जातं. कारण यापैकी 40 हून अधिक जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (NDA) होत्या. मतदानाच्या पूर्वसंध्येला, निवडणूक आयोगानं सांगितलं की, "मुंबई, ठाणे आणि लखनौमध्ये यापूर्वी मतदानाबाबत उदासीनता दिसून आलेली आहे आणि त्यामुळे शहरवासीयांना मोठ्या संख्येनं मतदान करण्यास सांगितलं आहे. निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, "निवडणूक आयोग विशेषत: या शहरांतील रहिवाशांना हा कलंक पुसण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करतो." गेल्या चार टप्प्यात आतापर्यंत एकूण 66.95 टक्के मतदान झालं आहे.


महाराष्ट्रातील हायव्होल्टेज लढती 



  • मुंबई उत्तरः पीयूष गोयल (भाजप) भूषण पाटील (काँग्रेस) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.

  • मुंबई उत्तर मध्य: उज्ज्वल निकम (भाजप) वर्षा गायकवाड (काँग्रेस) मधून निवडणूक लढवत आहेत.

  • मुंबई दक्षिणः अरविंद सावंत (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यामिनी जाधव (शिवसेना) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.

  • मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना) यांची अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्याशी लढत आहे.

  • मुंबई उत्तर-पश्चिम: रवींद्र वायकर (शिवसेना) हे अमोल कीर्तिकर (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

  • मुंबई ईशान्य: संजय दिना पाटील (शिवसेना उद्धव ठाकरे गट) मिहीर कोटेचा (भाजप) येथून निवडणूक लढवत आहेत.

  • कल्याण : वैशाली दरेकर-राणे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्या विरोधात डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना) लढत आहेत.

  • ठाणे : राजन बाबुराव विचारे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) नरेश म्हस्के (शिवसेना) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.

  • भिवंडी : कपिल मोरेश्वर पाटील (भाजप) सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी) कडून निवडणूक लढवत आहेत.

  • पालघर: हेमंत सवरा (भाजप) यांची भारती कामडी (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्याशी लढत आहे.

  • धुळे : भामरे सुभाष रामराव (भाजप) येथून शोभा दिनेश (काँग्रेस) निवडणूक लढवत आहेत.

  • दिंडोरी : भास्कर मुरलीधर भगरे (शरद पवार गट) यांच्याकडून डॉ. भारती प्रवीण पवार (भाजप) निवडणूक लढवत आहेत.

  • नाशिक : हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) हे राजाभाऊ वाजे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.