K. Chandrashekar Rao in Maharashtra : राज्याच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या बीआरएस (BRS) पक्षाची जोरदार चर्चा असून, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने या पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर पक्षाचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अनेक सभा घेत पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. दरम्यान, के चंद्रशेखर राव हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. के चंद्रशेखर राव हे उद्या (01 ऑगस्ट) रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूरमध्ये पोहचणार आहे. वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे. सोबतच ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी जाणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.


के. चंद्रशेखर राव हे उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे. त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी दुपारी दोन वाजता के चंद्रशेखर राव यांच्यासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता कोल्हापूर मधील अंबाबाईच्या दर्शनासाठी चंद्रशेखर राव हे जातील आणि तिथून परत हैदराबादला निघतील. 


रघुनाथ दादा पाटील बीआरएससोबत काम करणार? 


मागील काही दिवसांपासून के चंद्रशेखर राव हे पक्षाच्या वाढीसाठी राज्यात प्रयत्न करत आहे. अनेक महत्वाच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी त्याने ऑफर देखील दिल्या आहेत. आता अशातच ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी आपल्या सोबत काम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हैदराबादमध्ये राव यांची भेट घेऊन यापुढे बीआरएससोबत काम करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मिळत आहे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांच्यावर शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा मोठा पगडा राहिलेला आहे. त्यामुळेच यापूर्वी सुद्धा शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात राजकारण करण्याची योजना टायनी आखली होती. मात्र राजू शेट्टी यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे आता रघुनाथ दादा पाटील यांची शेतकरी संघटना महाराष्ट्रामध्ये बीआरएससोबत आगामी काळात काम करणार असण्याची शक्यता आहे. 


पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न... 


मुख्यमंत्री राव यांनी आपल्या पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांना प्रवेश दिले आहेत. तर मराठवाडा आणि विदर्भात सभा देखील घेतल्या आहेत. तर राज्यात्तील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाची पकड जमवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विशेष म्हणजे शेतकरी प्रश्नावर भर असलेल्या या पक्षाला ग्रामीण भागात प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


कोर्टाचा निकाल: कॉंग्रेसकडून निवडणूक लढवत BRS मध्ये सामील, कार्यकाळ संपण्याआधी गेली आमदारकी