Lalu Yadav On National Politics: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कोणीही पसंत करत नसल्याचे सांगितले. लालू यादव यांनी बिहारच्या राजकारणापासून ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत अत्यंत प्रांजळपणे आपले म्हणणे मांडले. त्यांनी भक्त चरणदास यांना शिवीगाळ केली नसल्याचेही सांगितले.


आरजेडी प्रमुख लालू यांच्या 15 वर्षांच्या राजवटीला विरोधी पक्षांनी 'जंगलराज' म्हटल्याबद्दलही त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, 15 वर्षे राज्यात स्थिर सरकार देऊन दीनदलितांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून दिले. ते म्हणाले की मानसिक गुलामगिरीतून मुक्त केलं. लालू यादव यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीबाबत सांगितले की, नितीश कुमार यांनी अधिकार्‍यांचा गैरवापर केला. ते म्हणाले की, राजद सगळीकडे आघाडीवर असल्याने त्यांनी हे केलं.


आरजेडी प्रमुख पुढे म्हणाले की, ते निवडणुकीच्या वेळी असते तर फरक पडला असता. ते म्हणाले की, त्यांच्या अनुपस्थितीत पक्ष आणि राजद कार्यकर्त्यांनी सर्व कामे हाती घेतली आहेत आणि जनतेनेही ते स्वीकारले आहेत. तेजस्वी आणि तेज प्रताप यादव यांच्यातील वादाबद्दल लालू यादव म्हणाले की, दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. भाजपने दिशाभूल केली. पण भाऊ आणि भाऊ एकत्र असून सर्व काही ठीक चालले आहे.


ते म्हणाले की, काश्मीरमध्ये बिहारच्या लोकांना मारले जात आहे. कलम 370 असतानाही हे मारले जात होते, ही काही नवीन गोष्ट नाही. अशा परिस्थितीत दहशतवादी हे करून आपली उपस्थिती दाखवत आहेत. केंद्राच्या राजकारणातील भूमिका विचारली असता लालू यादव म्हणाले की, केंद्राच्या राजकारणात आमची भूमिका विरोधी पक्षांची केंद्र काबीज करण्याची असेल, त्यासाठी सर्वजण एकत्र बसू.


काही महिन्यापूर्वी बिघडली होती प्रकृती
चारा घोटाळ्यात तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांची काही महिन्यापूर्वी प्रकृती ढासळली होती. लालू यादव यांना श्वास घेण्यात अडचण येत होत्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार छातीच्या संसर्गामुळे त्यांची तब्येत ढासळली होती. मात्र, 75 वर्षीय लालू यांची सध्या प्रकृती स्थिर आहे.