Chandrashekhar Bawankule on Bihar Election Result 2025: बिहार (Bihar Election 2025) निवडणुकांचे कल येण्यास सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील कलांमध्ये NDA ची ताकद वाढताना दिसत आहे. परिणामी या मतमोजणीच्या अंती नीतिशकुमार (Nitish Kumar) की तेजस्वी यादव? (Tejashwi Yadav) बिहारचा मुख्यमंत्री कोण? याचं उत्तर आज मिळणार आहे. बिहारमधील 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत NDA आणि महागठबंधन यांच्यात थेट टक्कर आहे, तर प्रशांत किशोरांच्या जन सुराज पक्षामुळे त्रिकोणी लढत रंगत आहे.

Continues below advertisement


बिहारच्या निवडणुकीत (Bihar Election Result 2025) झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांची देशभरात चांगलीच चर्चा झाली. अशातच या निवडणुकांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणातही पडल्याचे चित्र आहे. तर बिहार निवडणुकीच्या यशाने महाराष्ट्र भाजपचा विश्वास दुणावला असून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेख बावनकुळेंनी या निकालावर भाष्य करत काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.


Chandrashekhar Bawankule : एवढं मोठं बहुमत इतिहासात कधीच मिळालेल नाही, तेवढं बिहारमध्ये मिळत आहे


बिहारच्या जनतेचे मी आभार मानतो. पंत्रप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या विकास कामावर मतदारांनी शिक्कामोर्तब केला आहे. विकास, विश्वास आणि विकसित भारतासाठी जनतेनं मतदान केलं आहे. एवढं मोठं बहुमत इतिहासात कधीच मिळालेल नाही, तेवढं मोठं बहुमत बिहारमध्ये मिळत आहे. संपूर्ण देशावरच बिहारच्या निकालाचे परिणाम होईल. हे काही हवेतले वातावरण नाही. तर जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. महाराष्ट्रात 51% पेक्षा जास्त मते घेऊन आम्ही निवडणूक जिंकू. तर महायुती दोन तृतीयांश बहुमत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिंकेल. असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बोलताना व्यक्त केला आहे.


Chandrashekhar Bawankule On Congress: आगामी काळात काँग्रेस इतिहासातील सर्वात छोटा पक्ष


दरम्यान, काँग्रेस रोजच संपत आहे, राहुल गांधी हतबल झाले आहे. फक्त मतदार यादीचे चुकीचे मुद्दे समोर करून वेळकाढूपणा करत आहे. विकासाचा कुठलाच अजेंडा त्यांच्याकडे नाही. धर्म, जात पंथाचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे काम आहे. काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर बसायला कोणी तयार नाही. काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. काँग्रेसला बिहारमधून बाहेर काढले आहे. आगामी काळात काँग्रेस इतिहासातील सर्वात छोटा पक्ष होईल. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


Chandrashekhar Bawankule : ईव्हीएमचे खेळ, मतदार यादी चुकली, हे खेळ खेळले जातील


केंद्र सरकार आधीच मजबूत आहे, या निकालाने NDA आणखी मजबूत होईल. या निकालाने एनडीएची ताकद वाढून एनडीए आणखी घट्ट होणार आहे. निवडणूक नंतर आरोप-प्रत्यारोप होत राहती. पक्षात शिल्लक असलेले कार्यकर्ते पक्षात राहावे, संकुचित होत असलेली पार्टी वाचावी, यासाठी आता निवडणुकीनंतर आरोप प्रत्यारोप होतील. निकाल येण्यापूर्वीच राहुल गांधी विदेशात निघून गेले आहे. पुन्हा ईव्हीएमचे खेळ खेळले जातील. मतदार यादी चुकली होती, हे खेळ खेळले जातील. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.



आणखी वाचा