Maharashtra Politics : मुंबई : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण (Ashok Chavan) जबाबदार असल्याचा दावा काँग्रेसचे (Congress) काही नेते खासगीत बोलताना करतायेत. जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेमध्ये चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती. या चर्चेमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांवर दावा करण्याऐवजी अन्य मतदारसंघांवर दावा करण्यात आला. त्यामुळे ठाकरे गट (Thackeray Group) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar Group) राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या काही पारंपरिक मतदारसंघावर दावा केला. सांगली (Sangli), भिवंडी (Bhiwandi) आणि दक्षिण मध्य मुंबई (South Central Mumbai) ही याची काही उदाहरणं. त्यामुळे पक्षांतर करण्यापूर्वी अशोक चव्हाणांनी जाणीवपूर्वक हा घोळ करून ठेवला का, असा संशय आता काँग्रेसचे काही नेते व्यक्त करत आहेत.  


महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडूनच केला जातो. काँग्रेस नेत्यांची खाजगीत अशी चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेत अशोक चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती. या चर्चेदरम्यान त्यांनी काँग्रेसच्या पारंपरिक मतदार संघावर दावा करण्याऐवजी इतर मतदार संघावर दावा केला. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सांगली, भिवंडी आणि मुंबईतील काही मतदार संघावर दावा केला आहे. 


रामटेक, कोल्हापूर आणि अमरावती या मतदार संघावर ठाकरे गटाचा दावा होता. पण हे मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईचा पेच हा वाढला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक पक्षांतर करण्यापूर्वी हा घोळ केला का? हा संशय काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.