Mumbai News : स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेलं वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, अशामुळे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aaghadi) फूट पडू शकते असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसने सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी संजय राऊत यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. 


"मी सकाळीच संजय राऊतांशी बोललो, खूप दीर्घ चर्चा झाली. सावरकर प्रकरणावर त्यांचे आणि राहुल गांधींचे विचार वेगळे आहेत. मतभेदाच्या अधिकारावर आमचा विश्वास आहे असं बोलणं त्यांच्या-माझ्यात झालं. त्यामुळे याचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही असं संजय राऊतांनी सांगितल्याचं जयराम रमेश म्हणाले. 


होय, मला जयराम रमेश यांचा फोन आला : संजय राऊत 
तिकडे संजय राऊत यांनीही जयराम रमेश यांनी फोन आल्याची माहिती दिली. संजय राऊत म्हणाले, " भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले जयराम रमेश यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली बराच वेळ आम्ही फोनवर बोललो.  काही विषयांवर नक्कीच मतभेद आहेत त्या संदर्भात आम्ही माहिती उद्धव ठाकरे यांना दिली आहे". 


सावरकरांबाबत शिवसेनेची ठाम भूमिका 
काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावरकरांवर आपली भूमिका स्पष्ट केली होती.  राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेली वक्तव्य हे शिवसेनेला मान्य नाहीत. सावरकर हे महाराष्ट्रासाठी देशासाठी आदराचं आणि श्रद्धेचा विषय आहे विशेषता आमच्यासाठी, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. 


भारत जोडो यात्रेचा हा अजेंडा नव्हता,  हा विषय नव्हता, आमची भूमिका स्पष्ट केली आहे.  आम्ही आमच्या भूमीवर ठाम आहोत आणि राहणार आम्ही सावरकरांवर केलेली टिपणी सहन करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. 


मनसे-भाजपचं ढोंग
दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या आदेशानंतर बुलडाण्यात जाऊन, राहुल गांधींच्या शेगावातील सभेत निषेध नोंदवण्याचा निर्धार केला. तर इकडे मुंबई, ठाण्यात भाजपने रस्त्यावर उतरुन राहुल गांधींचा निषेध केला. मात्र  मनसे-भाजप रस्त्यावर उतरले हे ढोंग आहे.  राजकीय फायदे तोटे पाहून वीर सावरकरांवरून रस्त्यावर उतरण्याचं काहींचं काम सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले. 


सरदार पटेलांप्रमाणे सावरकरांचा पुतळा उभारा 
जर भाजपला वीर सावरकरांबाबत इतका  मान असता तर सरदार वल्लभाई पटेल यांचा जसा पुतळा बनवला तसा पुतळा वीर सावरकरांचा दिल्लीमध्ये बनवला असता. आमची तर स्टँडिंग डिमांड आहे की सावरकरांना भारतरत्न द्यावा, असं संजय राऊत म्हणाले.


VIDEO : Sanjay Raut : आम्ही Savarkar भक्त आहोत आणि राहणार, राहुल गांधींची भूमिका मान्य नाही ABP Majha