ते कर्जतमध्ये बोलत होते. महाराष्ट्राचे यांनी हाल केले आहेत,  परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे. कर्जतमध्ये 50 हजारचा लीड घेऊन जिंकायचं आहे, असंही आदित्य ठाकरे या वेळी बोलताना म्हणाले आहेत. 


जेव्हा गद्दारी झाली तेव्हा कोण आपल्या सोबत आहे हे कळत नव्हतं


आदित्य ठाकरे म्हणाले, कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही लढलात तुम्ही जिंकलेले आहात. सगळ्यांचे आभार मानायला मी येथे आलोय. उद्धव ठाकरेंनी आज मला येथे पाठवले आहे.  जेव्हा गद्दारी झाली तेव्हा कोण आपल्या सोबत आहे हे कळत नव्हतं.  सुरतवरुन गुवाहाटीला मिंधे पळत होते, तेव्हा आपली येथे सभा झाली होती. शंकराचार्य यांचा दर्शन घेतलं आज जनतेचा दर्शन घेतोय हीच वारी आपली आहे. 


मोदी सरकार, भाजप सरकार म्हणणारे आता NDA सरकार म्हणत आहेत


शंकराचार्य काल म्हणाले सगळ्यात मोठा घात विश्वासघात झाला, विश्वासघात सगळ्यात मोठं पाप आहे. त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे. आता या गद्दारांना धडा शिकवायचा आहे. एक टप्पा आपण पूर्ण केलाय. आपण एक लढाई जिंकली आहे. कारण मोदी सरकार, भाजप सरकार म्हणणारे आता NDA सरकार म्हणत आहेत. परिवर्तन घडलय आणि संविधान वाचविण्यासाठी आपण भाजपला थांबवल याच मी अभिनंदन करतो, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. 


मग एवढा मोठा पक्ष असून 9 जागा फक्त राज्यात आल्या


पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, केंद्रात 242 भाजपच्या जागा आहेत. केंद्रात कधी ही खेळ घडू शकतो आणि कधीही इंडिया आघाडीचा सरकार येऊ शकतो. महापालिका निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाही यांचा पराभव होण्याची त्यांना भीती आहे.  मोठा पक्ष म्हणून भाजप स्वतःला म्हणताय. ईडी, पोलीस, इलक्ट्रोल बॉण्ड सगळ्यात जास्त त्यांच्याकडे, यंत्रणा त्यांच्याकडे आहे. मग एवढा मोठा पक्ष असून 9 जागा फक्त राज्यात आल्या.  आपला पक्ष फोडला तरी आपण 9 जागा आणल्या. आता सांगा मोठा पक्ष कोणाचा?  येथे लागलेली गद्दारांची कीड आपल्याला येथून काढून टाकायची आहे. 


सरकार आपल्याला पुन्हा आणायचा आहे. सगळे उद्धव साहेबांना भेटतात. तेव्हा ते म्हणतात आम्ही मतं तुम्हाला दिली आहेत.  सावध राहून लढावं लागेल. या खोट्या अफवा पसरवताय हा आमच्यासोबत येणार तो आमच्यासोबत आहे म्हणताय.  काही काम केलं नाही आपल्यला कॉन्ट्रॅकर मित्रासाठी हे काम करताय. महाराष्ट्रला लुटण्याचा काम सुरु आहे. वेदांता फोक्सकॉन पेक्षा मोठा प्रोजेक्ट येणार मुख्यमंत्री म्हणाले होते, आला का मोठा प्रोजेक्ट? यांचं डोकं येथे चालत नाही. यांचं डोकं फक्त फोडाफोडी मध्ये चालतं. यांनी कधी राज्यासाठी मोदीकडे निधी मागितला का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या


Uddhav Thackeray vs BJP : हिंदुत्वाला धोका कुणी दिला, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांच्या 'मातोश्री' भेटीनंतर ठाकरे वि भाजपचं राजकारण पेटलं!