Rain Updates Konkan Railway: नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. याच पावसाचा परिणाम आता कोकण रेल्वेवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या रखडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुंबईकडे येणारी मेंगलोर एक्सप्रेस रखडली आहे.

Continues below advertisement

ट्रॅकवर झाड पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत 

आटगाव वाशिंद दरम्यान ट्रॅकवर झाड पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे खडवली स्टेशन दरम्यान रेल्वेट्रॅकवरील खडी व माती वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. कसाऱ्यावरून  छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणाऱ्या अप साईडच्या गाड्या पूर्णपणे विस्कळीत असून स्थानकादरम्यान अनेक एक्सप्रेस व ट्रेन एकामागे एक उभ्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्या वसई दिवा मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईत मुसळधार पाऊस-

नवी मुंबईसह पनवेलमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. आदई, सुकापूर भागातील गावात पाणी भरु लागले आहे. रस्त्यावर, सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पनवेल आदई, सुकापूर भागात सोसायटी, घरात पाणी घुसले आहे. गाड्या पाण्यात आर्ध्या डुबल्या आहेत. सोसायटीतील रहिवाशांना घराबाहेर पडण्यात अडचणी येत आहेत. कमरेपर्यंत पाणी साचलं आहे. कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कळंबोली भागात पुराचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गाड्या अडकल्या आहेत. कार, परिवहन बस बंद पडल्या आहेत. रहिवाशांचे हाल होतायेत. 

Continues below advertisement

भारंगी नदीच्या पाण्यात वाहनं गेली वाहून

शहापूरमधील गुजरातीबाग, चिंतामणनगर, ताडोबा परिसर आणि गुजरातीनगर या परिसरामध्ये भारंगी नदीचे पाणी घुसल्याने पाच ते सहा फोर व्हीलर आणि वीस ते पंचवीस टू व्हीलर या वाहून गेल्या आहेत. त्यानंतर अनेक फोर व्हीलर आणि टू व्हीलर चे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांमध्ये साधारण तीन फुटापर्यंत भारंगी नदीच्या पुराचे पाणी गेले आहे. त्यामुळं अनेक घरांचे नुकसान झालं आहे. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की गुजराती बाग आणि चिंतामणी नगर या परिसरामध्ये नदीला बांधण्यात आलेली संरक्षण भिंतीमुळं खाली जाणारे पाणी हे अडून राहते आणि त्यामुळे येथील भागाला पुराचा फटका बसलेला आहे. नगरपंचायत आणि काही ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने यांच्या फायद्यासाठी हे नदीला संरक्षण कटरे बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळं येथील नागरिकांचेमोठे नुकसान झाले आहे. हा कटरा त्वरित तोडण्यात यावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.