नाशिक : नातवानेच आजीला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. नाशिकमधील कोटंबी गावातील ठाणेपाड्यातील या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.


 

रखमाबाई राऊत या 65 वर्षीय वृद्धेचा नातवाने जाळल्याने मृत्यू झाला आहे. कैलास नामक नातूही भाजला असून, त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

 

दरम्यान, या प्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.