Raj Thackeray : मनसेचा 18 वा वर्धापन (MNS Vardhapan Din) दिन सोहळा आज नाशिकमध्ये पार पडला. या मेळाव्यातून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तोफ डागत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मराठ्यांनो यांच्या भुलपाथांना बळी पडू नका,  अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत राज ठाकरेंनी सरकारचे वाभाडे काढले आहे. 


राज ठाकरे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना सांगितले मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) काही होणार नाही. तांत्रिकदृष्ट्या ते टिकणार नाही, यांच्या भूलथापांना बळी पडू नका. जी गोष्ट होऊ शकत नाही त्याचे आश्वासन सरकार देत आहे. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य शिक्षण रोजगार देऊ शकत नाही. बाहेरील राज्याचे लोक पोसायची आणि आम्ही आंदोलन करायची. जातीजातीत विष कालवले जात आहे. महाराष्ट्र एकसंघ ठेवत नाही. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलेत हे यांना नकोय. तुमच्यात विष कालविण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप का झाले नाही?


अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत राज ठाकरे म्हणाले की, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप का झाले नाही?, पंतप्रधान फुले वाहून गेले त्याचे पुढे काय झाले? अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा उभा करण्याचा विषय आला तेव्हा मी सांगितले असे होणार नाही. समुद्र आहे तो. तिथे भर घालण्यासाठी किमान 25 ते 30 हजार कोटी लागतील. शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले स्मारक आहे. येणाऱ्या पिढीला पुतळे दाखविणार का? गड किल्ले उभे राहिले तर इतिहास दाखवू शकू. काँग्रेस सरकार, शिवसेना-भाजप आणि आताचे सरकार तेच सांगत आहे, असे वाभाडे त्यांनी काढले आहे. 


सर्व भोंगे एका रात्रीत काढतो


ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजातील लोकांनाही त्रास होतो. त्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकतात? एकदा माझ्या हातात सरकार द्या, सर्व भोंगे एका रात्रीत काढतो, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले आहे. समुद्रात दर्गा बांधत होते. एका रात्रीत ती काढली. पालिका, पोलिसांच्या का लक्षात आलं नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


आणखी वाचा 


पेशन्स ठेवा ते माझ्या खांद्यावर माझीच पोरं खेळवणार, राज ठाकरे यांचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा!