Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज नाशिकमध्ये प्रचाराचा अखेरचा दिवस असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून (Mahayuti) जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. त्यातच ऐन लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. 


नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना 20 तारखेपर्यंत हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांना नोटीस मिळत असल्याने ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या आधी दाखल असणाऱ्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावत असल्याचा उल्लेख नोटीसीत करण्यात आला आहे.


ठाकरे गटाचा आरोप 


आजपासून मतदानाच्या दिवसापर्यंत नाशिकमध्ये थांबायचे नाही, अशी नोटीस आम्हाला देण्यात आली आहे. हे हेतूपुरस्कर करण्यात येत आहे. समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांचा पराभव होणार आहे हे लक्षात आल्यामुळेच काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेतून लांब ठेवण्यासाठी हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे, असा आरोप युवा सेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे यांनी केला आहे.    


भगूरमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने 


निवडणुकी पूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केलेल्या विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांच्या भगूर शहरात महाविकास आघाडीकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shiv Sena Shinde Group) पदाधिकारी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी (Shivsena UBT) आमनेसामने आले. रॅली दरम्यान दोन्ही शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध झाल्याचे दिसून आले. दोन्ही गट आमनेसामने आल्यानं पोलिसांची धावपळ उडाली होती. पोलिसांनी मध्यस्थी यात वाद झाला नाही.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी


नाशकात 800 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप, आता शिवसेनेकडून राऊतांना जशास तसं उत्तर!