Nashik Long March : शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत (Mumbai) लाल वादळ धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लॉन्ग मार्च काढला आहे. दिंडोरी मधून हा लॉन्ग मार्च (Long March) निघाला असून विविध मागण्यांसाठी लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे.


गेल्या काही दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन (Farmers Protest) करत आहे. शिवाय आदिवासींच्या वनजमिनींच्या प्रश्नासंदर्भात माकप आक्रमक झाले असून नाशिक-मुंबई असा लॉन्ग मार्च (Nashik Mumbai Long March) काढण्यात आला आहे. नाशिकच्या (Nashik) दिंडोरी येथून या लॉंगमार्चला सुरवात झाली असून काहीवेळातच हा लॉन्ग मार्च नाशिक शहरात दाखल होणार आहे. दरम्यान लॉंगमार्च मध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी सर्व रस्त्यामध्ये भेटत असून सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कांदा दरावरून रस्त्यावर कांदा फेकत आंदोलनही केले आहे. 


यावेळी माजी आमदार जेपी गावित (JP Gavit) म्हणाले कि, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हैराण आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला, कांद्याचे भाव गेले, द्राक्ष बाग देखील खराब झाल्या आहेत. कापूस आणि सोयाबीनचे पण भाव देखील कोलमडले आहेत. शेतकरी वर्ग वैतागलेला असून सरकार याबाबत दखल घेत नाही. सरकारी कार्यालयात आता कंत्राटी भरती केली जात आहे. त्यामुळे सरकारची भूमिका हळूहळू बदलायला लागलेली आहे. म्हणून आमचा मोर्चा काढला असून महाराष्ट्राच्या जनतेला जागृत करण्यासाठी हा मोर्चा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मोर्चा असल्याचे गावित म्हणाले. 


मोर्चाला जागोजागी प्रचंड प्रतिसाद 


ते पुढे म्हणाले, वन जमिनीचा प्रश्न आहे. शेतकरी कसत असलेली वन जमीन आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर करावी हा मुख्य मुद्दा आहे. त्याचबरोबर सातबारा कोरा करावा अशी मोर्चाची मागणी आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेचा विषय आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्याला देखील मदत  मिळालेली नाही. सोयाबीन कांद्यासह सर्व शेतीमालांना भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्याचबरोबर आदिवासींना वन जमिनी मिळाव्यात या मुख्य मागणीसाठी हा लॉन्ग मार्च काढण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान या मोर्चाला जागोजागी प्रतिसाद मिळत असून मात्र सरकार काय दखल घेत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


आज पालकमंत्र्यांची भेट 


गेल्या काही दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे, शिवाय आदिवासींच्या वनजमिनींच्या प्रश्नासंदर्भात माकप आक्रमक झाले असून नाशिक मुंबई असा लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. नाशिकच्या दिंडोरी येथून या लॉंगमार्चला सुरवात झाली असून काहीवेळातच हा लॉन्ग मार्च नाशिक शहरात दाखल होणार आहे. दरम्यान लॉंगमार्च मध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी सर्व रस्त्यामध्ये भेटत असून सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कांदा दरावरून रस्त्यावर कांदा फेकत आंदोलनही केले आहे. दरम्यान आज सायंकाळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या सोबत मोर्चात सहभागी असणाऱ्या आंदोलकांशी बैठक होणार आहे. मात्र या संदर्भात आपण अनभिज्ञ असल्याचे माजी आमदार जे पी गावित यांनी सांगितले.