Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हा म्हटलं आजही मंत्रभूमी, यंत्रभूमी म्हणून ओळखले जाते. इथल्या निसर्ग सौंदर्याला तोड नाही. देशभरातून पर्यटक, भाविक नाशिकला भेट देतात. त्यामुळे नाशिक  स्मार्ट सिटी (Smart City) म्हणुनही ओळखले जाते. मात्र असे असतांना आजही जिल्ह्यात बहुतांश भाग पायाभूत सुविधांपासून वंचित असल्याचे वारंवार दिसून येते. कधी रुग्णाचा डोलीतून प्रवास, तर कधी शाळेतल्या मुलांचा पुराच्या पाण्यातून प्रवास, हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार अशी आर्त हाक नाशिकच्या ग्रामीण भागातील नागरिक घालताना दिसत आहे. 


नाशिक जिल्ह्याला (Nashik District) निसर्गाचं वरदान लाभलेले आहे. येथील निसर्गपर्यटन आज पर्यटकांना भुरळ घालते. राज्यातील हजारो नागरिकांना येथील औदयोगिक वसाहतीत रोजगार मिळवूं दिला आहे. शिवाय नाशिक शहरातून वाहणारी गोदावरे नदी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. तर जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) आदी परिसरात वर्षभर भाविकांसह पर्यटकांचा राबता असतो. मात्र आजही या आदिवासी तालुक्यातील बांधव सोयीसुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत असतांना आपल्याच बांधवांना होत असलेल्या त्रासांबद्दल उहापोह होणे आवश्यक आहे.  


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात उन्हाळ्यात पाणीटंचाईचे भीषण चित्र पाहायवयास मिळाले. अनेक भागात महिला विहरीत उतरून पाणी काढत असल्याचे राज्यभरातील नागरिकांनी पाहिले. त्यानंतर लाकडी बल्ल्यांवरून डोक्यावर हंडे घेऊन जात असल्याचा व्हिडीओ अनेकांनी पाहिला. त्यानंतर झालेल्या सुमार पावसामुळे अनेक ठिकाणाची परिस्थिती विस्कळीत झाली. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. धरणे हाऊसफुल्ल झाली. अनेक भागातील रस्ते खचल्याने संपर्क तुटला. एकूणच पहिल्या पावसात विदारक परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी पेठ, सुरगाणा तालुक्यातील पुराच्या पाण्यातून नागरिक, विद्यार्थ्यांसह जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. 


दरम्यान या सर्व घटनांनंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत संबंधित ठिकाणी लोखंडी पूल, महिला तात्पुरती पाण्याची व्यवस्था, काही लोकप्रतिनिधींचे भरघोष आश्वासने या सर्वानंतरही आजही परिस्थिती जैसे थे आहे. दोनच दिवसांपूर्वी सुरगाणा तालुक्यातील प्रसिद्ध केम नदीवर पूल नसल्याने छाती एवढ्या पाण्यातून नागरिक प्रवास करीत असल्याचे समोर आले. यात एक 75 वर्षीय जेष्ठ नागरिक देखील या पाण्यातून आपला जीव धोक्यात घालून नदी पार करत असल्याचे दिसले. तर आजची ताजी घटना असलेली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदुलीपाडा एका गर्भवती महिलेला डोलीतून प्रवास करावा लागल्याची दुर्दैवी बाब पुन्हा एकदा निदर्शनास आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ही दृश्य कधी थांबतील? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 


गेल्या अनेक वर्षांपासूनचा आदिवासी बांधवांचा हा प्रवास जैसे थे आहे. पाण्यासाठी भटकंती, डोलीतून प्रवास, पुराच्या पाण्यातून नदी पार करणे या सर्व गोष्टी येथील आदिवासी बांधवांसाठी नित्याच्या झाल्या आहेत. गेल्या काही वर्षात मात्र प्रकर्षाने समोर येत आहेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी असो कि इतर इतर स्थानिक प्रशासन तात्पुरत्या उपाययोजना करण्यावर भर देत असल्याने तेवढा काळ गेला कि पुन्हा आदिवासी बांधवांच्या नशिबी मरणकळा आल्याचं. त्यामुळे येथील नागरिकांच्या भवितव्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे दिसून येते. 


कनेक्टिव्हीटी खूप महत्वाची 
नव्याने मंत्री झालेले तसेच नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात अनेक वर्षांपासून काम करत असलेले डॉ. विजयकुमार गावित म्हणाले कि, अनेक भागात आदिवासी पर्यंत पोहचण्याची साधने नाहीत, हि साधने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जेणेकरून मुख्य प्रवाहामध्ये यायला अडचण होणार नाही. कनेक्टिव्हिटी नसल्याने आरोग्य सुविधा नाही, रस्ते सुविधा नाही, वाहतुकीच्या सुविधा नाही, त्यामुळे आदिवासी विकासापासून वंचित आहे. अनेक वर्षापासून या अडचणी असून त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यावर भर असेल. आदिवासी पट्ट्यात प्राथमिक दृष्ट्या कुपोषण हा खूप महत्त्वाचा विषय असून असून यावर काम करणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर कनेक्टिव्हिटी झाल्यास शिक्षण मुलांचे शिक्षण होईल, आरोग्य सुधारेल. त्याचबरोबर युवकांना रोजगार मिळेल या गोष्टी प्रकर्षानं कनेक्टिव्हिटी आल्यानंतर होतील, असेही ते म्हणाले.