नंदुरबार:  राज्यातील सर्वात मोठा मिरची (Chilly) उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्याची ओळख असून यावर्षी जिल्ह्यात सहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. हिरव्या मिरचीचा हंगाम सुरू झाला असून मिरचीचे दर 20 रुपयांनी कमी झाल्याने जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून उत्पादन खर्चही निघणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.


मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत


नंदुरबार जिल्हा हिरव्या आणि लाल मिरचीच्या उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध असून मागील वर्षी मिरचीला चांगले दर मिळाल्याने यावर्षी मिरचीच्या क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र हिरव्या मिरचीचा हंगाम सुरू झाला असून हिरव्या मिरचीला मिळणारा दर कमी असल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला  आहे. व्यापारी मनमानी पद्धतीने मिरचीचे दर कमी करत असल्याचा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे उत्पादन खर्चही वाढला आहे मिरचीला 15 ते 20 रुपये प्रति किलोचा भाव मिळत असून हा भाव अत्यंत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पंधरा दिवसापूर्वी मिरचीला 35 ते 40 रुपयांपर्यंतचा दर मिळत होता मात्र आता अचानक दर कमी झाल्याने तोडणीच्याही खर्च निघत नसल्याचा शेतकऱ्यांनी सांगितले.


मिरचीच्या दरात अचानक भाव कमी झाल्याने शेतकरी हतबल


देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची (Nandurbar Bajar Samiti) ओळख आहे.  मिरची तोडण्यासाठी प्रति पाच रुपये किलो खर्च येत असून बाजारात मिळणारा भाव हा अत्यल्प आहे.  सुरुवातीला 50 ते 40 रुपये किलो पर्यंतच्या दर मिळाला मात्र आता दहा रुपयापासून तर 20 रुपयापर्यंत दर मिळत असल्याने मिरचीचे उत्पादन घेणे परवडत नसल्याचं शेतकरी सांगतात. कांदा टमाटा त्यानंतर मिरचीच्या दरात अचानक भाव कमी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून सरकारने मिरचीचा हमीभाव जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहे. तर दुसरीकडे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. राजकीय भाष्य करणारे नेते शेतीमालाच्या भावावर का बोलत नाही असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. मिरचीचे भाव मागील वर्षापेक्षा दुपटीने वाढले असून त्यामुळं सर्वसामान्यांच्या जेवणातील महत्त्वाच्या घटक असलेला चटणीचे दरही वाढले आहेत.


हे ही वाचा :               


Health Tips : हिरव्या मिरचीचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर आत्ताच वाचा