मुंबई : मुंबई विमानतळावर एन्ट्री फीच्या नावे सुरु असणारी लूट कायम राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण याबाबत जीव्हीकेविरोधात कोणताही गुन्हा दाखल करु शकत नाही, असं उत्तर मुंबई पोलिसांनी दिलं आहे.


मुंबई विमानतळावर एन्ट्री फीच्या नावाखाली सुरु असलेल्या लुटी प्रकरणी मनसेनं जीव्हीकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र गु्न्हा निष्पन्न होत नसल्याचं कारण पुढे करत जीव्हीकेविरोधात कोणताही गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असं लेखी उत्तर मुंबई पोलिसांनी दिलं आहे.



मुंबई विमानतळावर फक्त तुमच्या वाहनानं प्रवेश केला तरी 130 रुपये एन्ट्री फी आकारली जाते. मात्र गाडी पार्क करायची नसल्यास 130 रुपयांचा भुर्दंड कशासाठी, याचं उत्तर कुणाकडेच नाही.

मुंबई विमानतळावरील एन्ट्री फी दहा दिवसात बंद करा : शिवसेना


संपूर्ण देशात फक्त इथंच एअरपोर्ट ऑथरिटी आणि सिव्हिल एव्हिएशनचे नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची रोज लाखोंना लूट होते.

मुंबई विमानतळ अतिसंवेदनशील आहे. वाहनांच्या गर्दीमुळेच खासगी वगळता इतर वाहनांवर एंट्री टोल घेतला जातो, असं या आरोपांवर एअरपोर्ट ऑपरटिंग कंपनी GVK चं म्हणणं आहे.

..म्हणून मुंबई विमानतळावर एन्ट्रीसाठीही 130 रुपये टोलवसुली!


एअरपोर्ट ऑथरिटी आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या करारानुसार टोल दर ठरवण्याचे सर्वस्वी
अधिकार GVK कडे आहेत. प्रवाशांसाठी खास एलिव्हेटेड रोड बांधला गेला आहे. त्याच्या सेवेसाठी हजारो कर्मचारी असतात. एंट्री फीचा पैसा या सर्व देखभालीसाठी दिला जातो, असं GVK तर्फे सांगितलं जातं.

2014 साली 'माझा'च्याच बातमीनंतर सर्वपक्षीय आंदोलन होऊन ही टोलधाड बंद झाली होती. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी 20 रुपये वाढीव दरानं ती पुन्हा सुरु झाली.