एक्स्प्लोर

Mumbai Rain : विश्रांतीनंतर पुन्हा मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, पुढील तीन दिवस 'या' भागात पावसाचा इशारा

Mumbai Rain : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत (Mumbai) आज पहाटेपासून पुन्हा राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

Mumbai Rain : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत (Mumbai) आज पहाटेपासून पुन्हा राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून अधून मधून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं वातावरण आल्हाददायक झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

सध्या राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, राज्याच्या बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहे. पाऊस जर नाही पडला तर खरीपाची पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण आणि नद्यांच्या पाणीसाठ्यात देखील घट होत आहे. त्यामुमुळं सध्या पावसाची गरज आहे. दरम्यान, मुंबईत उघडीप घेतलेला पावसानं पुन्हा सुरुवात केली आहे. पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. 

या भागात पावसाची शक्यता 

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगाल उपसागरात पुन्हा एखाद्या वातावरणीय प्रणालीची निर्मिती होऊ शकते. तिचे मध्य भारतात (उत्तर छत्तीसगड दरम्यान) वायव्य दिशेने होणारे स्थलांतरण आणि परिणामकारक प्रभावामुळं महाराष्ट्रात पुढे पाऊस होऊ शकतो. कोकणातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तसेच विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस म्हणजे 25 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मात्र केवळ मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवत आहे.

मराठवाड्यात पाणी टंचाईचं संकट 

मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहेत. पाण्याअभावी खरीपाची पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडं पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात एक महिन्यात टँकर दीडपटीने वाढले आहेत. ऑगस्टमध्ये मराठवाड्यात टँकरची मागणी वाढू लागली. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात टँकरची मागणी वाढू लागली आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी 404 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 41 तर जालना जिल्ह्यात 43 टँकर, मराठवाड्यात 84 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या महिन्यात 36 टॅंकर होते.

पावसानं ओढ दिल्यामुळं जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 

राज्यात आत्तापर्यंत 96 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या (kharif crop Sowing) पूर्ण झाल्या आहे. राज्यात सरासरी 142 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी केली जाते. आत्तापर्यंत 137 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मागील वर्षीच याच कालावधीत 140 लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्र थोड्या प्रमाणात घटलं आहे. सध्या पावसानं ओढ दिल्यामुळं खरीपाची पीकं धोक्यात आली आहेत. तसेच पावसानं ओढ दिल्यामुळं जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळं नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Bhandara Rain : सलग तिसऱ्या दिवशीही भंडाऱ्यात जोरदार पाऊस, शेत शिवारात शिरलं पाणी; गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 4 कोटी 20 लाख रुपयांचं सोनं जप्त, तीन जणांना अटक
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 4 कोटी 20 लाख रुपयांचं सोनं जप्त, तीन जणांना अटक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget