मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 347 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 420 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,12,162 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.


मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4744 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1271 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सध्या 38 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 


राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती


राज्यात आज  2740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 233  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 09 हजार 021  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे. राज्यात आज 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 49 हजार 880 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,102 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (5), नंदूरबार (3),  धुळे (1), जालना (36), परभणी (50), हिंगोली (16),  नांदेड (23), अमरावती (97), अकोला (28), वाशिम (1),  यवतमाळ (9), वर्धा (4), भंडारा (1), गोंदिया (5), चंद्रपूर (50), गडचिरोली (15) या 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


राज्यातील 10 जिल्ह्यात आज शून्य रुग्णांची नोंद


राज्यातील 51 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. राज्यात आज 10 जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. धुळे, नंदुरबार, परभणी, नांदेड, अकोला अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.


देशात आज 27,254 नव्या कोरोनाबाधितांची नोंद 


केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 27,254 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकादिवसापूर्वी 28,591 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत 219 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 37,687 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


संबंधित बातम्या