मुंबई :  कायम विनाअनुदानित  शाळांच्या शिक्षकांनी 100 टक्के अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलनाचं हत्यार उपसल्यानं बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या निकालाला उशीर होण्याची शक्यता आहे. कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीनं उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. विना अनुदानित शाळांसाठी प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान मिळावं आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवा संरक्षण मिळावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.


विनाअनुदानित शाळांमध्ये बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिका पडून आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पेपर तपासणीसाठी घेऊन जायला शिक्षकांनी नकार दिला आहे. यामुळे दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल उशीरा जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण विनाअनुदानित शाळा कृती समितीने दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.


राज्यातील साडे सहा हजार शाळांमध्ये बोर्डाचे पेपरचे गठ्ठे तपासणीविना पडून असून शिक्षक बोर्डाचे पेपर तपासायला तयार नाहीत.  विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवा संरक्षण या मुख्य मागण्यांसाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.  24 फेब्रुवारी रोजी संघटनेने करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर सुद्धा कुठल्या प्रकारची मागणी मान्य न झाल्याने हे सर्व शिक्षक बहिष्कारावर ठाम आहेत.


मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात.  बोर्डाचे विषयावार पेपर झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात मात्र दहावी बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नाही.  त्यामुळे वेळेत निकाल जाहीर होणार का ? असा प्रश्न या शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे पडला आहे. 


संबंधित बातम्या :


Nitin Raut : वीज कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या, दहावी-बारावीची परीक्षा लक्षात असू द्या, उर्जामंत्र्यांचे संपकऱ्यांना आवाहन


MPSC : एमपीएससीच्या गट क वर्गातील पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी, 3 एप्रिलला होणार परीक्षा