- पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध, ग्राहकांना खात्यातून हजार रुपयेच काढता येणार
- पीएमसी बँकेच्या खातेधारकांना मोठा दिलासा, सहा महिन्यातून एकदा 10 हजार रुपये काढता येणार
- पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल
PMC Bank Scam | शक्य ती पावलं उचलणार, अर्थमंत्र्यांचं खातेदारांना आश्वासन
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2019 03:45 PM (IST)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या भाजपा कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी त्यांना घेरत आमचे पैसे आम्हाला परत द्या, अशी मागणी केली.

मुंबई : पीएमसी बँकेचा व्यवहार केंद्र सरकारच्या अखत्यारित येत नाही. पण आज संध्याकाळी मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरशी याबाबत चर्चा करणार आहे. या घोटाळ्याचा अभ्यास करुन, आवश्यक ती पावलं उचलली जातील, असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलं आहे. या मोठ्या घोटाळ्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण पहिल्यांचा समोर आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या भाजपा कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी त्यांना घेरत आमचे पैसे आम्हाला परत द्या, अशी मागणी केली. त्यानंतर भाजप कार्यालयातच सीतारमण यांनी खातेधारकांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खातेदारांच्या मदतीसाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं. गरज पडल्यास कायद्यात तरतूद अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की, "पीएमसी ही मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक आहे. याची नोंदणी सहकार निबंधकाकडे असते. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याचं रेग्युलेशन पाहते. केंद्र सरकारच्या अखत्यारीत त्याचा व्यवहार येत नाही. मात्र तरीही मी माझ्या सचिवांना ग्रामविकास खात्याशी चर्चा करुन, या विषयाची गंभीर दखल घ्यायला सांगितलं आहे. गरज पडल्यास कायद्यात तरतूद करुन असे गैव्यवहार थांबवता येतील का याबाबत पावलं उचलणार आहोत. तसंच पुढच्या संसदीय अधिवेशनात याबाबत काही कठोर तरतुदी करुन या गैरव्यवहारावर चाप बसवण्याचे काम केलं जाईल. आज संध्याकाळी मी आरबीआयच्या गव्हर्नरसोबत याबाबत चर्चा करणार आहे." संबंधित बातम्या