मुंबई: एलफिन्स्टन चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांचा तपास अहवाल समोर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी आपल्या तपासात जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन कर्मचारी स्टाफला क्लीन चीट दिली आहे.


दादर पोलिसांनी आपल्या चौकशी अहवालात, एलफिन्स्टन चेंगराचेंगरीसाठी पिक अवरला झालेली अतिगर्दी आणि अचानक आलेला पाऊस कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

आम्ही जवळपास निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. या चेंगराचेंगरीचं मुख्य कारण म्हणजे पाऊस आणि अचानक वाढलेली गर्दी आहे. एकाचवेळी चार लोकल स्टेशन परिसरात आल्या. त्या लोकलमधून प्रवासी आल्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

चौकशीदरम्यान आम्ही स्टेशन मास्तरांकडून त्या दिवशीची रेल्वेची माहिती आणि एलफिन्स्टन-परळ स्टेशनवर किती प्रवासी उतरले याची माहिती घेतली.

इतकंच नाही तर आम्ही हवामान विभाग आणि मुंबई महापालिकेकडेही त्यादिवशी 10.26 वा पाऊस पडला होता, याची माहिती मागवली आहे. त्यामुळे पाऊस पडत होता हा आमचा दावा खरा ठरेल”, असं दादर पोलिसांनी सांगितलं.

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीला आठ दिवस उलटले आहेत. 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. परळ आणि एल्फिन्स्ट स्टेशन्सना जोडणाऱ्या फूटओव्हर ब्रीजवर चेंगराचेंगरी झाली होती.

याप्रकरणाची चौकशी दादर पोलीस करत आहेत. पोलिसांनी चौकशीदरम्यान रेल्वे पोलीस, जीआरपी आणि रेल्वे स्टाफ-स्टेशन मास्तर किंवा तिकीट बुकिंग स्टाफ या कोणालाही जबाबदार धरलेलं नाही. तर चेंगराचेंगरीसाठी पिक अवरला झालेली अतिगर्दी आणि अचानक आलेला पाऊस कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांनी 39 जखमींसह जवळपास 70 जणांची जबाब घेऊन हा निष्कर्ष काढला. यादरम्यान पोलिसांनी त्या दिवशी ड्युटीवर
असलेले स्टेशन मास्तर अनिल गुप्ता, आरपीएफ कॉन्स्टेबल, तिकीट क्लार्क यांचेही जबाब नोंदवले. ज्या कॉन्स्टेबलने सर्वात आधी चेंगराचेंगरीची माहिती स्टेशन मास्तरांना दिली होती, त्यांचा जबाब घेण्यात आला.

संबंधित बातम्या

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी म्हणजे घातपात, जनहित याचिकेत दावा


एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचा आकडा 23 वर




एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : महिलेच्या मृतदेहावरील दागिने ओरबाडले


एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 61 वर्षीय आलेक्स कोरीयांचा गुदमरुन मृत्यू




एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : ... तर ही दुर्घटना टाळता आली असती!