India Weather Updates : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील वातावरणात पुन्हा बदल होत आहे. सध्या उत्तर भारतात किमान तापमानात वाढ होत असली तरी सोसाट्याचा वारा वाहत आहे. तसेच काही ठिकणी पावसानं देखील हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थंडी वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. मागील चार पाच दिवसांपासून दिल्लीतील नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा हुडहुडी भरली आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दिल्ली, बिहार, पंजाबमध्ये जोरदार वारे वाहणार असून, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील उन्हाची चाहूल लागली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने थंडीपासून दिलासा मिळाला आहे.



महाराष्ट्र


महाराष्ट्रात कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. राज्यात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमान 30 अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. गारठा कमी झाला आहे. पुढच्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, उत्तर मगाराष्ट्रात थंडीचा जोर कयम आहे.



दिल्ली


राजधानी दिल्लीत आज ढगाळ आकाश राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजधानीत कमाल तापमान 26 अंश, तर किमान तापमान 13 अंश राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


राजस्थान


वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव आजपासून राजस्थानमध्ये दिसणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून 24 फेब्रुवारीपर्यंत राज्यात ढगाळ आकाश राहणार असून, पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच पूर्व राजस्थानमध्ये 20 ते 30 किमी वेगाने वारे वाहतील. तर पश्चिम राजस्थानमध्ये केवळ 30 ते 40 किमी वेगाने धुळीचे वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर राजस्थानमध्ये पाऊस पडू शकतो.


बिहार


बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आजही ढगाळ वातावरण राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाटणासह अनेक शहरांचे कमाल तापमान 26 अंश आहे. तर किमान तापमान 14 अंश राहण्याची अपेक्षा आहे. राज्यात पुढील काही दिवस असेच वातावरण राहणार आहे.


पंजाब


पंजाबमध्ये हवामान स्वच्छ होऊ लागले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज राज्यात ढगाळ वातावरण राहील. आज कमाल तापमान 24 अंश तर किमान तापमान 12 अंश राहण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी 26 फेब्रुवारीला राज्यातील अनेक भागात पाऊस पडणार आहे.


जम्मू आणि काश्मीर


जम्मू-काश्मीरमध्ये आजपासून हवामान बदलणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये ढगाळ आकाश राहील. यासोबतच काही दिवस अधूनमधून पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. आज जम्मूच्या बहुतांश भागात कमाल तापमान 19 अंश तर किमान तापमान 12 अंश राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, काश्मीरमध्ये कमाल तापमान 0 अंश तर किमान तापमान -4 अंश राहण्याचा अंदाज आहे.


उत्तराखंड


राज्याच्या अनेक भागात उद्यापासून तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 11 अंशांपर्यंत, तर किमान तापमान 3 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: