मुंबई : यूपीएससी परीक्षेचा शुक्रवारी निकाल लागला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 100 हून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले. मूळच्या लातूरच्या असणाऱ्या नीतिशा जगतापने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये यश संपादन केलं असून तिची 199 रॅन्क आहे. महत्वाचं म्हणजे नीतिशा जगताप ही केवळ 21 वर्षाची आहे. त्यामुळे तिचे हे यश कौतुकास्पद आहे. 

Continues below advertisement

पदवीच्या दुसऱ्या वर्षापासून अभ्यासाला सुरुवातनीतिशा जगतापने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून सायकॉलॉजी या विषयातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनच नीतिशाने यूपीएससीचा नियोजनबद्ध अभ्यास सुरु केला. आपण यूपीएससी करायची असं बारावी पासूनच ठरवल्याचं नितिशाने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 

नितिशाने आपली यूपीएससीची तयारी पुण्यात राहून केली. तिने युनिक अकॅडमीमधून मार्गदर्शन घेतल्याचं सांगितलं. सुरुवातीपासून नितिशा अभ्यासामध्ये हुशार असून तिला अभ्यास कर असं कधी सांगायची वेळ आली नसल्याचं नितिशाची आई अश्विनी जगताप यांनी सांगितलं. नितिशाचे वडील संजय यांनीही नितिशा पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणार असल्याचा विश्वास होता असं सांगितलं. 

Continues below advertisement

नितिशाला अजून तरी सर्व्हिस अॅलॉट झाली नाही. पण आयएएस हे आपले पहिले प्राधान्य असल्याचं नितिशाने सांगितलं. या सर्व्हिसचा उपयोग गरजू लोकांच्या विकासासाठी करणार असल्याचं नितिशाने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बिहारच्या शुभम कुमारने देशात पहिला येण्याचा मान मिळवला. या परीक्षेत महाराष्ट्रानेही आपली यशस्वी कामगिरी कायम ठेवली असून एकूण 761 उमेदवारांपैकी राज्यातील 100 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर विनायक नरवाडे हा दूसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीएससीतील गुणवत्ता यादीत या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 37 वा क्रमांक पटकावला आहे.

 

संबंधित बातम्या :