सातारा : गावकऱ्याच्या हत्येविरोधात महाबळेश्वरमधील 110 गावांनी बंद पुकरला आहे. महत्त्वाचं म्हणजे या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळत आहे.


महाबळेश्वरमध्ये आज 110 गावातील गावकरी एकत्रित येणार आहेत. त्यानंतर त्याचं मोर्चा आणि सभेत रुपांतर होईल. काही ठिकाणी रास्तारोकोही होणार आहे.

मेटकुटार, गुरेघर, तापोळा, क्षेत्र महाबळेश्वर अशा प्रमुख गावांचा या महाबळेश्वर बंदमध्ये सहभाग आहे.

विकेण्डला महाबळेश्वरमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु बंदमुळे शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी आलेल्या पर्यटकांची मात्र गैरसोय होत आहे.