पंढरपूर : सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढत जात अजून ऋतुमानानुसार विठुरायाला (Vitthal) उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात झाली आहे . कार्तिकी यात्रेच्या प्रक्षाल पूजेनंतर दुसऱ्या दिवशी पासून दरवर्षी देवाला उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात होते. यामध्ये उब देण्यासाठी देवाला मऊ काश्मिरी शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 


रात्री शेजारातीनंतर विठुराया (Vitthal) जेव्हा निद्रेसाठी जात असतो तेव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढण्यात येतो . देवाचे अंग पुसून घेतल्यावर देवाच्या डोक्यावरील मुकुट काढून तेथे 150  हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात येते. यानंतर देवाच्या कानाला थंडी वाजू नये म्हणून मस्तकी असलेल्या मुकुटावर  सुती उपरण्याची पानपट्टी देवाच्या कानाला बांधण्यात येते. यावर पारंपरिक असलेली देवाची उबदार काश्मिरी शाल अंगावर  घालण्यात येते. या कपड्यांमुळे देवाला नखशिखांत उबदारपणा जाणवेल याची खबरदारी घेतली जाते . यानंतर देवाला तुळशीहार व फुलांचे हार घातले जातात. आरती करीत देवाला निद्रेसाठी सज्ज केले जाते .


 पहाटे काकड्याच्यावेळी देवाच्या अंगावरील ही काश्मिरी रजई फक्त काढून बाकीचे उबदार कपडे तसेच ठेवण्यात येतात . रुक्मिणी मातेलाही अशाच पद्धतीने उबदार रजई गुंडाळून ठेवण्यात येते. साधारणपणे प्रक्षाळपुजेच्या दुसऱ्या दिवसापासून देवाची हुडहुडी घालविण्यासाठी हा खास पद्धतीचा पोशाख देवाला घालण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून  साधारण होळीपर्यंत हे उबदार कपडे देवाला घालण्यात येतात..


 परभणीत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद 


यंदा परभणी जिल्ह्यात थंडी पडण्यास डिसेंबरचा तिसरा आठवडा उजडलाय. जिल्ह्यात आज 10.07 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली असुन सर्वत्र थंडीला सुरुवात झाली आहे.या थंडीमुळे सकाळी व्यायाम,मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली असुन उबदार कपड्यांचा वापर ही केला जातोय एकूणच यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद आज झालीय. त्यामुळे येते काही दिवस हे तापमान असेच कमी राहण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे परभणीकरांना (Parabhani)  थंडीचा सामना करावा लागणार आहे आहे


इतर महत्त्वाच्या बातम्या :


 मराठा समाज नेतृत्व करण्यास सक्षम नाही, हे दाखवण्यासाठी भाजपकडून घाणेरडे राजकारण; सुषमा अंधारेंचा आरोप