एक्स्प्लोर

सांगलीत उद्योग व शेतीच्या पाण्यावर आजपासून उपसाबंदी, जलसंपदा विभागाचे आदेश

कोयना धरणातील पाण्याने मे महिन्याच्या अखेरीस तळ गाठला आहे. सध्या धरणात 15.47 टीएमसी पाणी आहे. यातील उपयुक्‍त पाणी केवळ 10.15 टीएमसी आहे. चांदोलीची क्षमता 34.40 आहे. आता उपयुक्‍त पाणीसाठा केवळ 2.30 टीएमसी आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यातील उद्योग व शेतीच्या पाण्यावर जलसंपदा विभागाने आजपासून उपसाबंदी लागू केली आहे. केवळ पिण्यासाठीच पाणी उपसा करण्यास परवानगी देत बंदी काळात उपसा केल्यास संबंधिताचा पाणी परवाना, विद्युत पुरवठा एक वर्षासाठी रद्द करण्यात येणार आहे. तसेच उपसा सामग्री जप्त करण्यात येणार आहे. बिगर सिंचन वापरकर्त्यांनी प्रदूषित, सांडपाणी, औद्योगिक वापराचे पाणी थेट नदीत सोडू नयेत, असे आदेशही जलसंपदा विभागाने दिले आहेत.

सांगली जिल्ह्यात यंदा तापमानाने गाठलेली उच्चांकी आणि यामुळे नदी पात्रातील पाण्याचे मोठ्या प्रमाणवर झालेले बाष्पीभवन आणि धरणातील कमी झालेला पाणीसाठा या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने हा आदेश काढला आहे. टप्प्याटप्प्यामध्ये ही उपसाबंदी लागू करण्यात आली असून 21 जूनपर्यंत पाऊस न पडल्यास उपसाबंदी कायमस्वरुपी ठेवण्यात येणार आहे.

कृष्णा पाणलोट क्षेत्रातील धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. कोयना धरणात केवळ 10.15 टीएमसी आणि चांदोली धरणात केवळ 2.30 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा उन्हाची तीव्रता मोठी आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान दहा वर्षांत पहिल्यांदाच तब्बल 42 ते 43 अंशांपर्यंत गेले आहे. एकीकडे सातत्याने उपसा सुरू असतानाच पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत आहे. परिणामी कोयना, चांदोली, धोम, कण्हेर या धरणांतील पाणी वेगाने कमी झाले.

मे महिन्यात उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे पिकांसाठी पाण्याची मागणी वाढली. त्यामुळे नदीकाठच्या शेतकर्‍यांनी ऊस, केळी, सोयाबीन, द्राक्षे, भाजीपाला व अन्य पिकांसाठी पाण्याचा प्रचंड उपसा केला. तसेच दुष्काळी भागासाठी टेंभू, म्हैसाळ व ताकारीतून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 25 टीएमसीवर आला.

कोयना धरणातील पाण्याने मे महिन्याच्या अखेरीस तळ गाठला आहे. सध्या धरणात 15.47 टीएमसी पाणी आहे. यातील उपयुक्‍त पाणी केवळ 10.15 टीएमसी आहे. चांदोलीची क्षमता 34.40 आहे. आता उपयुक्‍त पाणीसाठा केवळ 2.30 टीएमसी आहे.

पुढील आठ दिवसांत या धरणांतील पाणी मृतसंचयाच्या खाली जाणार आहे. परिणामी उपसाबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ पिण्यासाठीच पाणी उपसा करण्यास परवानगी आहे. त्यामुळे या पाणी योजनांची वीज सुरु ठेवण्यात येणार आहे. परंतु सिंचन योजनांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार आहे.

उपसाबंदीचे वेळापत्रक

- 4 जून ते 9 जूनपर्यंत कृष्णा नदीवर वाळवा तालुक्यातील बहे बंधारा ते राजापूर बंधार्‍यापर्यंतच्या दोन्ही बाजूला शेतीसाठी पाणी उपसाबंदी केली आहे. - 10 जून ते 15 जून सिंचन योजना सुरु करण्यास परवानगी दिली आहे. - 16 जून ते 21 या कालावधीत पुन्हा उपसाबंदी असेल. त्यानंतरही पाऊस पडला नाहीतर सिंचनाचे पाणी कायमचे बंद केले जाणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime Dhananjay Deshmukh: मोठी बातमी! अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिली; दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिली; दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
Vidhan Parishad Election 2026: पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Embed widget