एक्स्प्लोर

सांगलीत उद्योग व शेतीच्या पाण्यावर आजपासून उपसाबंदी, जलसंपदा विभागाचे आदेश

कोयना धरणातील पाण्याने मे महिन्याच्या अखेरीस तळ गाठला आहे. सध्या धरणात 15.47 टीएमसी पाणी आहे. यातील उपयुक्‍त पाणी केवळ 10.15 टीएमसी आहे. चांदोलीची क्षमता 34.40 आहे. आता उपयुक्‍त पाणीसाठा केवळ 2.30 टीएमसी आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यातील उद्योग व शेतीच्या पाण्यावर जलसंपदा विभागाने आजपासून उपसाबंदी लागू केली आहे. केवळ पिण्यासाठीच पाणी उपसा करण्यास परवानगी देत बंदी काळात उपसा केल्यास संबंधिताचा पाणी परवाना, विद्युत पुरवठा एक वर्षासाठी रद्द करण्यात येणार आहे. तसेच उपसा सामग्री जप्त करण्यात येणार आहे. बिगर सिंचन वापरकर्त्यांनी प्रदूषित, सांडपाणी, औद्योगिक वापराचे पाणी थेट नदीत सोडू नयेत, असे आदेशही जलसंपदा विभागाने दिले आहेत.

सांगली जिल्ह्यात यंदा तापमानाने गाठलेली उच्चांकी आणि यामुळे नदी पात्रातील पाण्याचे मोठ्या प्रमाणवर झालेले बाष्पीभवन आणि धरणातील कमी झालेला पाणीसाठा या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने हा आदेश काढला आहे. टप्प्याटप्प्यामध्ये ही उपसाबंदी लागू करण्यात आली असून 21 जूनपर्यंत पाऊस न पडल्यास उपसाबंदी कायमस्वरुपी ठेवण्यात येणार आहे.

कृष्णा पाणलोट क्षेत्रातील धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. कोयना धरणात केवळ 10.15 टीएमसी आणि चांदोली धरणात केवळ 2.30 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा उन्हाची तीव्रता मोठी आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान दहा वर्षांत पहिल्यांदाच तब्बल 42 ते 43 अंशांपर्यंत गेले आहे. एकीकडे सातत्याने उपसा सुरू असतानाच पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत आहे. परिणामी कोयना, चांदोली, धोम, कण्हेर या धरणांतील पाणी वेगाने कमी झाले.

मे महिन्यात उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे पिकांसाठी पाण्याची मागणी वाढली. त्यामुळे नदीकाठच्या शेतकर्‍यांनी ऊस, केळी, सोयाबीन, द्राक्षे, भाजीपाला व अन्य पिकांसाठी पाण्याचा प्रचंड उपसा केला. तसेच दुष्काळी भागासाठी टेंभू, म्हैसाळ व ताकारीतून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 25 टीएमसीवर आला.

कोयना धरणातील पाण्याने मे महिन्याच्या अखेरीस तळ गाठला आहे. सध्या धरणात 15.47 टीएमसी पाणी आहे. यातील उपयुक्‍त पाणी केवळ 10.15 टीएमसी आहे. चांदोलीची क्षमता 34.40 आहे. आता उपयुक्‍त पाणीसाठा केवळ 2.30 टीएमसी आहे.

पुढील आठ दिवसांत या धरणांतील पाणी मृतसंचयाच्या खाली जाणार आहे. परिणामी उपसाबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ पिण्यासाठीच पाणी उपसा करण्यास परवानगी आहे. त्यामुळे या पाणी योजनांची वीज सुरु ठेवण्यात येणार आहे. परंतु सिंचन योजनांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार आहे.

उपसाबंदीचे वेळापत्रक

- 4 जून ते 9 जूनपर्यंत कृष्णा नदीवर वाळवा तालुक्यातील बहे बंधारा ते राजापूर बंधार्‍यापर्यंतच्या दोन्ही बाजूला शेतीसाठी पाणी उपसाबंदी केली आहे. - 10 जून ते 15 जून सिंचन योजना सुरु करण्यास परवानगी दिली आहे. - 16 जून ते 21 या कालावधीत पुन्हा उपसाबंदी असेल. त्यानंतरही पाऊस पडला नाहीतर सिंचनाचे पाणी कायमचे बंद केले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget