Maharashtra Water Issue : राज्यातील अनेक भागात आता पाणीटंचाई (Water Issue) जाणवू लागली आहे. मे महिन्यातच लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय. त्यामुळे टंचाईग्रस्त भागात शासनाकडून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यातील अनेक गाव आणि वाड्या वस्त्यांवर शासकीय टँकर पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात शासकीय आणि खाजगी टँकरचा समावेश आहे. राज्यातील 270 गावं आणि 639 वाड्यांवर सध्या एकूण 213 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 51 शासकीय आणि 162 खाजगी टँकरने राज्यात पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात राज्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या 184 होती. 

राज्यात सर्वाधिक पाण्याचे टँकर मुंबई आणि कोकण विभागात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात एकूण 100 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर या पाच जिल्ह्यातील 148 गावं आणि 451 वाड्यांवर 4 शासकीय आणि 96 खाजगी टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 40 गावं आणि 137 वाड्यांवर एकूण 30 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

राज्यातील टँकर संख्या....

जिल्हा   गावं   वाड्या   शासकीय टँकर खाजगी टँकर एकूण 
ठाणे   40 137 0 30 30
रायगड   48 158 0 29 29
रत्नागिरी   42 85 04 06 10
पालघर   18 71 00 31 31
नाशिक  33 17 10 16 100
जळगाव  13 01 08 06 14
अहमदनगर  09 41 09 00 09
पुणे  24 105 05 15 20
सातारा  08 20 07 00 07
जालना  10 04 06 05 11
हिंगोली  08 00 02 07 09
अमरावती  06 00 00 06 06
वाशीम  01 00 00 01 01
बुलढाणा  08 00 00 08 08
यवतमाळ  02 00 00 02 02
एकूण  270 639 51 162 213

 
राज्यातील धरणातील विभागनिहाय जलसाठा

विभाग  सध्याचा जलसाठा  गतवर्षीचं आजचा जलसाठा 
अमरावती  46.78 48.39
छत्रपती संभाजीनगर  46.41 48.18
कोकण  39.22 47.41
नागपूर  44.75 36.88
नाशिक  45.56 40.20
पुणे  26.09 30.85

इतर महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain Update :राज्यातील धरणांत 36 टक्के पाणीसाठा, शेतीसह उद्योगांना पाणी कमी पडण्याची भीती