Market Committee Election Live Updates : राज्यात बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी

Market Committee Election : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Market Committee Election) रणधुमाळी सुरु आहे. कुठे निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. या निवणुकीसाठी 28 एप्रिलला मतदान होत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Apr 2023 12:31 PM
प्रांताधिकारी आणि तहसिलदार डॉ.अजीत नवलेंच्या भेटीला

Kisan sabha : प्रांताधिकारी शशिकांत मंगळूरे, तहसिलदार सतिष थेटे हे डॉ.अजीत नवलेंच्या भेटीला आले आहेत.  डॉ.अजीत नवले आणि मोर्चेकरांशी अधिकाऱ्यांची चर्चा सुरु आहे. मोर्चेकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

बाजार समितीच्या निवडणुकीत दौंड तालुक्यात भाजप आणि मित्र पक्षाच्या वतीनं पॅनल

Market Committee Election : राज्यभरातील बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठी 28 तारखेला मतदान होत आहे.  दौंड तालुक्यामध्ये भाजप आणि मित्र पक्षाच्या वतीने पॅनल करण्यात आले आहे. दौंडमध्ये राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा विकास पॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादीला टक्कर देत आहेत. आम्ही सर्व शेतकरी व व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचून या मार्केट कमिटीची दुरावस्था, रखडलेले कामकाज आणि उद्याच्या काळात केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवण्याचा मानस या सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांच्या मध्ये सकारात्मकता आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही लढत आहोत. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली बाजार समिती विकसित व्हावी, या उद्देशाने आम्ही लढत आहोत अशी प्रतिक्रिया आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. 

पार्श्वभूमी

Market Committee Election Live Updates : ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Market Committee Election) रणधुमाळी सुरु आहे. कुठे निवडणूक बिनविरोध पार पडली आहे तर कुठे निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा समना होत आहे. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. 


28 एप्रिलला होणार मतदान


राज्यातील 257  कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक लागली आहे. यामधील काही बाजार समितीत्या बिनविरोध देखील झाल्या आहेत. बाजार समित्यांसाठी येत्या 28 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 30 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे हे आपल्याला 30 एप्रिललाचं समजणार आहे. 


राजकीय नेत्यांचे ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप


स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप अशी लढती होणार आहेत.
तर काही ठिकाणी काही पक्ष स्वतंत्र ताकद अजमावणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. 
दरम्यान, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रचाराच्या सभा, संपर्क मोहीम यासह सर्व पद्धतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही पॅनलकडून सुरु आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील करत आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.