Maharashtra Breaking News LIVE Updates : सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 35 ते 40 जण जखमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Mar 2022 11:30 PM
परभणी - एकाच दुचाकीवर पाच जण , तिघांनी गमावला जीव

एकाच दुचाकीवर 5 जण जाणे युवकांना चांगलेच महागात पडले आहे. एसटी आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला असुन इतर 2 जण गंभीर झाले आहे.परभणीच्या चारठाना परिसरातील सिंगटाळा पाटीवर ही घटना घडलीय..
 
 

 Solapur News Update : सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 35 ते 40 जण जखमी

 Solapur News Update : सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. मालट्रकने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 35 ते 40 जण जखमी झाले असून काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. अपघातातील सर्व वारकरी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावचे रहिवासी आहेत. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी जवळ हा अपघात झाला आहे. 
 

अमरावती - शेतशिवारातील शेततळ्यात दोघांचा बुडून मृत्यू..

अमरावती जिल्ह्यातील कुष्टा बु.शेतशिवारातील शेततळ्यात दोघांचा बुडून मृत्यू..


अचलपूर तालुक्यातील कुष्टा बुद्रुक येथे आज सायंकाळी 5 ते 6 च्या सुमारास गावालगतच असणाऱ्या शैलेश हरिदास नाथे यांच्या शेतातील शेततळ्या नजिक गावातीलच 11 वर्षीय हर्षाली विनोद वांगे मुलींचा अचानक तोल गेल्याने ती शेततळ्यात बुडाली,..


हीच बाब लक्षात येता शेतातील रखवालदार यांचा मुलगा बाजीलाल मुन्ना कास्‍देकर (वय 25) तिला वाचविण्यासाठी गेला असता त्याचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला..

मुंबईच्या कृती आराखड्याचं अनुकरण देशानं करावं - मुख्यमंत्री

मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याच्या (MCAP) अहवालाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या अहवालाचे लोकार्पण पार पडले असून यावेळी मुंबई आणि येथील पर्यावरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाची वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त  इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.


दरम्यान मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या कृती आराखड्याचं अनुकरण देशानं करावं असा आहे, असं म्हणतााना असं केल्यास जगातला पहिला देश आपण ठरु शकतो असंही ते म्हणाले. आपण शाश्वत विकास असेल असा प्रयत्न करायला पाहिजे आणि तसं ठरवायला पाहिजे मी या सर्वाची वाट पाहातोय, असंही ते म्हणाले. आपण समुद्राचं पाणी पिण्यालायक करणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले

टाळी एका हाताने वाजत नाही - अजित पवार

Ajit pawar in pune latest news : एकमेकांचा राग केला नाही पाहिजे. एकमेकांना संपविण्यासाठी आपल्या हातातील यंत्रणांचा उपयोग केला जातोय.  हे चुकीचे आहे. आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांच्याबद्दल बोलण्याची आपली योग्यता आहे का याचाही विचार केला जात नाहिए. माझं असं मत आहे की दोन्ही बाजूंकडून चुकतय. टाळी एका हाताने वाजत नाही, असे अजित पवार म्हणाले. 

Pune : पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला

Pune : पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आहे. दरम्यान किल्ल्यावर शेकडो पर्यटक  होते. त्यापैकी दिडशे ते दोनशे पर्यटकांना मधभाश्या चावल्या. 

Tejas More  On Pravin Chavan : प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयात मी घड्याळ बसवले नाही ; तेजस मोरे यांचे स्पष्टीकरण 

Tejas More  On Pravin Chavan : विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण खोटे बोलत आहेत. त्यांच्या कार्यालयात घड्याळ आणि त्यामधे छुपा कॅमेरा मी बसवला नाही. परंतु, प्रविण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. मी घड्याळ बसवले असेल तर प्रवीण चव्हाण यांनी तसे पुरावे द्यावेत, असे आव्हान तेजस मोरे यांनी केले आहे. 

Praniti Shinde : नाना पटोलेंसमोर आमदार प्रणिती शिंदेंना मंत्रीपद देण्याची मागणी

सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेस टिकवायची असेल तर प्रणिती शिंदेंना मंत्रीपद द्या अशी मागणी महापालिकेचे कॉंग्रेसचे गटनेते आणि  नगरसेवक चेतन नरोटे यांची जाहीर व्यासपीठावरुन केली आहे. 

Nashik News Update : नाशिकच्या रामकुंडावर नमामी गोदा भूमिपूजन कार्यक्रमावेळी पोलीस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

Nashik News Update :  नाशिकच्या रामकुंडावर नमामी गोदा भूमिपूजन कार्यक्रमावेळी पोलीस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे. कार्यक्रमाला परवानगी नसतानाही आयोजन केल्याप्रकरणी पोलीस नोटीस देण्यासाठी आल्यानंतर भाजप पदाधिकारी आक्रमक झाले होते. 

राजकीय वादातुन हाणामारी..अकरा जण गंभीर जखमी; परिसरात तणावपुर्ण वातावरण
राजकीय वैमन्यासा धर्मापुरीत दोन गटात मुंबळ हाणामारी झाल्याची घटना आज दुपारीच्या सुमारास घडली. रस्त्यावर झालेल्या या दोन्ही गटा लाकडी काढा खोरे, कोयते यांचा वार करण्यात आला. या हाणामारीत दोन्ही गटाचे ११ जण गंभीर आहेत..

 
Solapur : सोलापूरात पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाची डान्सबारवर रेड; 49 आरोपी लाखोंच्या मुद्देमालासह ताब्यात

Solapur : सोलापुरात रात्री उशिरा बेकायदेशीर सुरु असलेल्या डान्सबारवर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा टाकत कारवाई केलीय. सोलापुरातल्या विजापूर रोडवरील गुलमोहर आर्केस्ट्रा बारमध्ये रात्री 3 वाजताच्या सुमारास नृत्यांगनांवर काही जण पैसे उधळत होते. यावेळी रात्र गस्तीवर असलेल्या विशेष पथकाने छापा टाकत कारवाई केली, यावेळी पोलिसांना पाहताच पळापळी सुरू झाली. मात्र सर्व दरवाजे बंद असल्याने ४९ लोकांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख 71 हजार  380 रुपयांच्या रोख रकमेसह 59 लाख 78 हजार 880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या पूर्वीदेखील या ऑर्केस्ट्रा बार सोलापूर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर पून्हा एकदा याचं बार वर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा ऑर्केस्ट्रा बार एका माजी पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगाच चालवत होता. या संपूर्ण प्रकरणात सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार मालक, बार चालक यांच्या सहित 49 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Nashik News : नाशिक: वाडीवऱ्हे गावाजवळ असलेल्या कंपनीत अपघात, पत्रे बसवण्याचे काम करणाऱ्या दोन कामगारांचा उंचावरून कोसळून मृत्यू

Nashik News : नाशिक: इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे गावाजवळ असलेल्या फॅब कंपनीत अपघात, पत्रे बसवण्याचे काम करणाऱ्या दोन कामगारांचा उंचावरून कोसळून मृत्यू; शनिवारी रात्रीची घटना 

The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स" ला राज्यात करमुक्त करा' भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांची मागणी

The Kashmir Files : ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा', अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हा चित्रपट विवेक रंजन अग्निहोत्री यांनी साकारला आहे. आतापर्यंत या देशात कथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जिहादी वृत्तीचा अनुनय करण्यात आला. 


प्रत्येक राष्ट्र भक्तांनी हा सिनेमा पाहावा तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्त करावे, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. पुन्हा कथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली या सिनेमावर बंदी घालण्याचा प्रचार मविआतील काही हिंदुद्वेष्ट्या लोकांनी सुरू केला असल्याच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्यास मविआ सरकारला याची फळे भोगावे लागतील, असा इशाराही शिवराय कुळकर्णी यांनी दिला आहे.

Wardha : वर्धेतील हनुमान टेकडीला अचानक लागली आग

Wardha :   वर्धा येथील हनुमान टेकडीला अचानक लागली आग लागली. नितेश कराळे (खदखद  मास्तर) यांना आग लागलेली दिसताच त्यांनी प्रशासनास फोन केला मात्र संपर्क झाला नसल्याने त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना बोलवून घेतले,त्यानंतर काही झाडांच्या फांद्या तोडून लगेच विद्यार्थ्यांसह आग विझवण्यासाठी प्रयत्न केले,समयसुचकतेमुळे वेळीच आग विझवली,सायंकाळी जिथे ही आग लागली तिथे जवळच पोलिस क्वॉटर आणि लोक वस्ती होती त्यामुळे आगीला वेळीच आटोक्यात आणण्यात आले.

अमरावतीत युवक काँग्रेसच्या पदाधिकारीच्या वाहनाला ट्रकची धडक; लोकसभा महासचिव रोहित देशमुखचा मृत्यू तर पाच जण जखमी

Amravati :  अकोला येथील युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटोपून अमरावतीला परत येताना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर जवळ त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान झालेल्या या अपघातात रोहित देशमुख (वय 27) यांचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले पाच जण जखमी आहेत. 


अपघातात रोहित देशमुख यांच्यासोबत कारमध्ये असणारे युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, चांदुर रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा मुलगा परीक्षित जगताप, युवक काँग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष अध्यक्ष पंकज मोरे आणि वाहनचालक आणि सनी नावाचा युवक जखमी झाले आहेत.

पोलीस कर्मचाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Latur : लातूर (Latur) जिल्ह्यातील किल्लारी पोलीस ठाण्यातील (Thane) एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातच स्वतःला बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.हि घटना मध्यरात्री घडली आहे. पोलिस अधीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत 


किल्लारी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी साहेब सावंत (वय 38) यांनी मध्यरात्री स्वतावर गोली झाडून आत्महत्या केली आहे. काही दिवसांपासून ते पैशाच्या देवाण घेण्यातून मानसिक त्रासातून जात होते ..त्यातूनच ही आत्महत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.सध्या किल्लारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत.घटनेची माहिती मिळताच लातूर चे पोलिस अधीक्षक निखिल पिंगले किल्लारी पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे.मृतदेह पोस्टमार्टम साठी लातूर च्या वैद्यकीय महाविद्यालयत पाठविन्यात आला आहे.सकाळी माहिती मिळताच किल्लारी आणि परिसरातील नागरिकांनी पोलिस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती. आत्महत्येपूर्वी काही चिठ्ठी लिहून ठेवण्यात आले आहेत. त्याची सत्यता पडतालनी सुरु आहे

पार्श्वभूमी

'बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' हसन मुश्रीफांचं वक्तव्य अन् एकच हशा, सांगितली सरकार स्थापनेची आठवण


sangli news updates:   'बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' अशी चारोळी बोलून दाखवलीय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी. महाविकास आघाडीच्या सरकार  स्थापनेची आठवण सांगताना  ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही चारोळी करून दाखवली आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला. इस्लामपूर पंचायत समितीच्या आवारातील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण आणि शिक्षण विभागाच्या ई-लर्निंग डिजिटल स्टुडिओचे उद्घाटन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.


यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर आम्ही सत्तेत येणार नाही असे वाटत असताना आम्ही सत्तेत कसे आलो याचा किस्सा सांगताना ही चारोळी ठोकली. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम , महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


Ajit Pawar : राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप बंद करुन विकासाला महत्व द्यावं : अजित पवार


Deputy cm Ajit Pawar  : आजपर्यंत देशात, राज्यात कधीही अशी परिस्थिती नव्हती. यापूर्वी कधीही नोटीसा देणं, केंद्रीय यंत्रणांचा वापर करणं असं होत नव्हतं. यावर सर्वच राजकीय पक्षांनी विचार करायला हवा, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. प्रत्येकाने आपापलं काम करावं, जनतेनं ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांचं काम करावं असेही अजित पवार म्हणाले. पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. दरम्यान, राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप बंद करुन विकासाला महत्व द्यावं असेही ते म्हणाले.


आज भाजपच्या होणाऱ्या आंदोलनाबाबत देखील अजित पवार यांना विचारण्यात आले, त्यावेळी ते म्हणाले की, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. काल यशवंतराव चव्हण यांची जयंती होती. त्यानिमित्त आम्ही सर्वांनीच त्यांचे स्मरण केले. त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची जबाबादारी स्विकारली. यावेळी त्यांनी जबाबादारी असणाऱ्या व्यक्तिंनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं काम केलं पाहजे, जबाबादारी कशी पूर्ण केली पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन कसं गेलं पाहिजे  हे दाखवून दिल्याचे अजित पवार म्हणाले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप एकण्यात सामान्य लोकांना अजिबात रस नाही. आमचे प्रश्न सुटावेत याकडे लोकांचे लक्ष असल्याचे अजित पवार म्हणाले. आरोप प्रत्यारोप बंद करुन विकासाला महत्व दिलं पाहिजे आणि त्यातून राज्याचा विकास कसा  होईल याकडं लक्ष द्यायला हवं असे अजित पवार म्हणाले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.