Gondia Train Accident News : रायपुरकडून नागपुरच्या दिशेने  जाणाऱ्या "भगत की कोठी" (Bhagat Ki Kothi) ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात (Train Accident) झाल्याची घटना घडली. यावेळी समोरून जात असलेल्या मालगाडीला 'भगत की कोठी ट्रेन'ने मागून धडक दिल्याचं वृत्त समोर येत आहे.  या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला. सुत्रांच्या माहितीनुसार या ट्रेनच्या अपघातात 50 च्या वर लोक किरकोळ जखमी झाल्याचं समजत आहे. जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान ही घटना आज पहाटे 4 वाजता घडल्याचं सांगण्यात येत आहे. माहितीनुसार या अपघातात 53 लोक किरकोळ जखमी तर 13 जणांना थोडा मार लागला आहे.





 


सिग्नल व्यवस्थित न मिळाल्याने अपघात?


मालगाडीला 'भगत की कोठी' ट्रेन ने दिली मागून धड़क दिली, तेव्हा ट्रेनचा एक S3 डब्बा रुळाखाली घसरला. अपघातात 53 च्या वर लोक  जखमी तर 13 किरकोळ जखमी झाले आहे. एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन नागपूरच्या दिशेने जात होत्या, 'भगत की कोठी' ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाल्याने ही गाडी समोर निघाली होती, मात्र याच रुळावर मालगाडी समोर चालत असताना गोंदिया शहराला लागून असलेल्या रेल्वे गेटवर सिग्नल व्यवस्थित न मिळाल्याने भगत कोठी ही ट्रेन मालगाडीला धडकली अशी माहिती आहे.


 






13 गंभीर जखमी


या ट्रेनमधील 13 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, या भीषण अपघातात एकही मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, पहाटे 4.30 वाजता री-रेल्मेंटचे काम पूर्ण झाल्यानंतर, ही ट्रेन सकाळी 5.24 वाजता घटनास्थळावरून निघाली आणि 5.44 वाजता गोंदियाला पोहोचली. त्याचवेळी सकाळी 5.45 वाजता अप आणि डाऊन वाहतूक पूर्ववत झाली.


अपघात कसा घडला? रेल्वे विभागाकडून चौकशी


गोंदियात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या रेल्वे अपघाताची पाहणी गोंदिया रेल्वे अपघाताची DRM मणिदर सिंग उत्पल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया शहराला लागुन असलेल्या चुलोद गावाजवळ रायपुरच्या दिशेने येणाऱ्या भगत की कोटी या ट्रेन ने एकाच रेल्वे रुळावर समोर चालत असलेल्या माहालगाडीला धडक दिल्याने हा अपघात घडला सिंग्नल प्रणालीच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाले आहे. सुदैवाने या रेल्वे अपघात कुणीही दगावले नसले तरी एकाच रुळावर दोन रेल्वे गाड्या एक दुसऱ्याला आदळल्या. रेल्वे विभाग याचा शोध घेत आहे. या घटनेची पाहणी स्वत: डिआर एम मणिदर सिंग उत्पल यांनी केली असल्याने अपघाताची तीव्रता काय होती हे लक्षात येते.