राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...



Manipur Violence : मणिपूर हिंसाचारात अडकलेले 25 विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले, महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना यश



मणिपूरमधल्या हिंसाचारात (Manipur Violence) अडकलेल्या महाराष्ट्रातल्या 25 विद्यार्थ्यांना इम्फाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत आणण्यात आलं आहे. मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 25 विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला.  (वाचा सविस्तर)


राज्यातील अडीच लाख उमेदवारांना प्रतीक्षा असलेली शिक्षक भरती जुलै-ऑगस्टमध्ये होणार! 


यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात शिक्षक भरतीसाठीची अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट परीक्षा) झाल्यानंतर 24 मार्च रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जवळपास अडीच लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. मात्र परीक्षा झाल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक भरती (Teachers Recruitment) नेमकी कधी होणार? याची प्रतीक्षा या उमेदवारांना होती. त्यामुळे आता ही शिक्षक भरती 15 मे नंतर संच मान्यता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून (Education Department) समोर आली आहे. (वाचा सविस्तर)



टीईटीनंतर राज्यातील सर्वात मोठा घोटाळा! संभाजीनगरचा कृष्णा गिरी 'असा' चालवायचा रॅकेट



 पुणे पोलिसांनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी दहावी नापास मुलांना चक्क पास असल्याचे प्रमाणपत्र वाटप करत होती. यासाठी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सारखी बनावट वेबसाईट देखील तयार करण्यात आली होती. दरम्यान दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (वाचा सविस्तर) 


 पृथ्वीराज चव्हाणांची कॅटेगरी काय? शरद पवारांचा बोचरा वार, फडणवीसांच्या 'राष्ट्रवादीचं पार्सल' टीकेलाही उत्तर


"आपला पक्ष पुढे कसा जाणार हे आमच्या सहकाऱ्यांना माहित आहे. आम्ही काय करतो, त्यात आम्हाला समाधान आहे, ते लिहितील त्यांना लिहायचा अधिकार आहे. आमच्या दृष्टीने त्याला महत्त्व नाही," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'सामना'तील अग्रलेखावर (Saamana Editorial) भाष्य केलं. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. (वाचा सविस्तर)


बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचं राग, चिमुकल्या भाच्यासोबत महिलेचं अघोरी कृत्य


 पाच वर्षांपूर्वी बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचं राग मनात ठेवत, एका महिलेने पतीच्या मदतीने बहिणीच्या दोन वर्षाच्या मुलाचा कैचीने सुन्ता केल्याचं संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) समोर आला आहे. पीडित मुलाची आई घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. तर 25 एप्रिल रोजी बायजीपुरा भागात ही घटना घडली असून, या प्रकरणी 7 मे रोजी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वाचा सविस्तर)