Maharashtra Corona Update महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. दररोज हजारोंच्या संख्येनं नव्या कोरोनाबाधितांचा आकडा आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करत परिस्थिती किती गंभीर वळणावर पोहोचली आहे, याची माहिती देण्यात येते. सोमवारी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात 20854 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात केली असून, त्यांना रग्णालयातून रजा देण्यात आली. तर, दिवसभरात 31 हजार 643 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 


राज्यात नव्यानं आढळणाऱ्य़ा कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा कमीच दिसत आहे. सध्याच्या घडीला राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 85.71 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर मृत्यूदर 1.98 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी दिवसभरात कोरोनामुळं 102 जणांचा मृच्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राज्यात विविध भागांमध्ये 336584 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. 


Corona मुळं क्वारंटाईन असणाऱ्या मिलिंद सोमणला पीपीई किट घालून भेटायला आलं तरी कोण? 


कोरोनाचा संसर्ग पाहता, राज्यात तब्बल 1607415 जण गृह विलगीकरणात आहेत. तर, 16614 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. पुढील काही दिवस कोरोना रुग्णसंख्येच्या आकड्यांवरच राज्यात लागू असणारे निर्बंध आणखी कठोर होणार का याबाबतचा निर्णय अवलंबून असणार आहे. 


उद्धवजी अडचण अशी आहे की... ; आनंद महिंद्रांकडून लॉकडाऊनच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला 


दरम्यान, रविवारी राज्यात आज तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णसंख्येचा हा आकडा अनेकांनाच धडकी भरवून गेला. एकिकडे राज्यात रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत असल्यामुळं, आता राज्य शासनाकडून काही कठोर निर्देश देण्यात येत आहेत. इतकंच नव्हे, तर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मर नियमांचं उल्लंघ करण्याचं सत्र असंच सुरु ठेवलं तर हे निर्बंध आणखी कठोर होऊन लॉकडाऊनमध्ये परावर्तीत होण्यास वेळ लागणार नाही, असंच एकंदर चित्रंही राज्यात पाहायला मिळत आहे.