मुंबई :   राज्यात आज 785 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 937  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. 


सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू


राज्यात आज  सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,72,444 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.98 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 14534 सक्रिय रुग्ण


राज्यात एकूण 14534 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 4989  इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 1826   सक्रिय रुग्ण आहेत.


 सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली


देशात एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतोय, तर दुसरीकडे मंकीपॉक्स विषाणूही डोकं वर काढताना दिसत आहे. अशात एक दिलासादायक बाब म्हणजे देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे, पण तुलनेन मृत्यूची संख्या वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 866 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 20 हजार 279 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 36 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे सलग आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना संसर्गात घट झाली आहे. दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्गात घट झाली आहे. रविवारी दिवसभरात 18 हजार 148 कोरोनारुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  देशातील सक्रीय रुग्णांची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. सध्या देशात 1लाख 50 हजार 877 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.34 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.46 टक्के आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 148 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 32 लाख 28 हजार 670 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.