मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या  (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज राज्यात 149  रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात  222  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज  दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज  दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,23, 959  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 90, 68, 319  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


राज्यात सध्या  1084 अॅक्टिव्ह रुग्ण 


राज्यात सध्या 1084 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत  277  अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 136 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.


 देशातील कोरोना रुग्णांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ 


देशातील कोरोना रुग्णांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1 हजार 778 नवीन रुग्ण आढळले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1 हजार 581 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि 33 जणांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 12 हजार 749 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात देशात 2 हजार 542 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 87 वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 16 हजार 605 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 73 हजार 57 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.


संबंधित बातम्या :


Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ, गेल्या 24 तासांत 1778 नवे रुग्ण, 62 जणांचा मृत्यू




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha