मुंबई : राज्यात काल 8 हजार 172 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 950 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 74 हजार 594 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.28 टक्के झाले आहे. 


राज्यात काल 124 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख  429 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 5 लाख 77 हजार 615 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 156 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. 



तीन जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद नाही


जालना (43), हिंगोली (61), यवतमाळ (22), गोंदिया (66), चंद्रपूर (27)  या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 339 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर धुळे,  भंडारा, गोंदिया या तीन जिल्ह्यात काल एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. 



मुंबईत गेल्या 24 तासात 466 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


काल मुंबईत 466 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 806 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,06,040 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,618 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 993 दिवसांवर गेला आहे.