मुंबई : राज्यात आज 1444 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2006 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

Continues below advertisement

आठ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 

राज्यात आठ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,39, 594 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.03 टक्के इतकं झालं आहे. 

राज्यात एकूण 10902 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 

राज्यात एकूण 10902 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4412  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2478  सक्रिय रुग्ण आहेत. 

Continues below advertisement

 मुंबईत मंगळवारी 516 रुग्णांची नोंद (Mumbai corona cases)

कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात वाढत आहे. आज मुंबईत 516 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. , मुंबईत मंगळवारी 829 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,20,079 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,694 झाली आहे. सध्या मुंबईत 4,412 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 516 रुग्णांमध्ये 485 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने  मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. 

देशात सक्रिय रुग्णांची संख्या घटली (India Corona Updates)

देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 439 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत 2,152 रुग्णांची घट झालीय. रविवारी दिवसभरात देशात 7,591 नवीन कोरोनाबाधित आढळले होते. ही जून महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत झालेली सर्वाधिक घट आहे. याआधी 07 जून रोजी देशात 7,233 रुग्णांची नोंद झाली होती आणि त्यानंतर कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळाला. देशातील कोरोना रुग्णांप्रमाणे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे. सध्या देशात 65 हजार 732 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. यामधील बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षणं असणारे आहेत. देशात गेल्या 24 तासांत 22,031 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे. देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 38 लाख 25 हजार 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.