Chandrakant Patil : कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. गेल्या 50 वर्षांपासून कोल्हापूरची इंचभरही हद्दवाढ झालेली नाही. या पार्श्वभूमीवर हद्दवाढीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्याय सांगितला आहे.   

Continues below advertisement

चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीवर भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, हद्दवाढीचा निर्णय पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पटवून सांगितले, तर हा निर्णय 3 मिनिटांत संपून जाईल. शहरातील नेते आणि ग्रामीण भागातील नागरिक यांनी हातात हात घालून चालले पाहिजे. जर ग्रामीण भागातील नागरिकांना न समजवता निर्णय घेतला तर यादवी होईल, वाद निर्माण होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले.   

शाहू मिलच्या विकासासाठी प्रयत्न करणार

दरम्यान, रखडलेल्या शाहू स्मारकावर बोलताना सांगितले की, हेरिटेज जागेवर स्मारक करू आणि उरलेल्या जागेवर एखादी कंपनी सुरू करता येईल. नागरिकांच्या हाताला काम देणं हे शाहू महाराज यांची भूमिका होती. 

Continues below advertisement

केवळ बारामती नाही, तर 16 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित 

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बारामती मिशनवरही माहिती दिली. ते म्हणाले की, बारामतीमध्ये प्रथम भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जातील आणि नंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जातील. प्रत्येकाला आपला पक्ष  वाढवण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ बारामती नाही, तर 16 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे ते म्हणाले. याच पद्धतीने याआधी सर्व मतदारसंघांवर उध्दवजींनी लक्ष केंद्रित केले असतं तर हे घडलं नसतं, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरही भाष्य केले. ते केवळ राज ठाकरे यांना नाही, तर अनेक नेत्यांना भेटत असल्याचे सांगितले. 

144 लोकसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी भाजपच्या जागा निवडून आल्या नाहीत, पण त्याठिकाणी भाजप खासदार निवडून येऊ शकतात त्या जागांवर अधिक भर देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. 2024 मध्ये 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या