मुंबई : राज्यात आज 1910 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1273 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


सात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात सात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,26, 918 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 12,355 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 12,355 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 6269  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2138  सक्रिय रुग्ण आहेत. 


मुंबईत 832 रुग्णांची नोंद (Mumbai Corona Update)


आज मुंबईत 832 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंळवारी 330 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,13,829 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.7 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,675 झाली आहे. सध्या मुंबईत 6,269 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 832 रुग्णांमध्ये 783 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 970 दिवसांवर गेला आहे.


गेल्या 24 तासांत 8 हजार 586 नवे कोरोनाबाधित (India Coronavirus Cases)


 गेल्या 24 तासांतील कोरोनाच्या (Covid-19) आकडेवारीबाबत बोलायचं झालं तर, देशात 8 हजार 586 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 96 हजार 506 वर पोहोचली आहे. तसेच, देशातील एकूण बाधितांचा आकडा 4 कोटी 43 लाख 57 हजार 546 वर पोहोचला आहे.  आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण मृतांचा आकडा 5 लाख 27 हजार 416 वर पोहोचला आहे. असं असलं तरी दिलासादायक बाब म्हणजे, देशातील रिकव्हरी रेट वाढला आहे. देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांची नोंद केली जात आहे. पण यापैकी अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 37 लाख 33 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.