मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1003 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1052 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 70 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे. 
 
राज्यात आज 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 11 हजार 766  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1 लाख 517  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1056  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 42 , 67, 353 प्रयोगशाळा  तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईत आज 275 रुग्णांची भर तर दोन जणांचा मृत्यू


गेल्या 24 तासात मुंबईत 275 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 256 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 2821 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,38,599 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2098 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे. 


 देशात गेल्या 24 तासांत 10 हजार कोरोनाबाधितांची नोंद


 देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या घटताना दिसतोय. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 10 हजार 197 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या एक लाख 28 हजार 555 सक्रिय रुग्ण आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, 527 दिवसांनी देशात सर्वात कमी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जाणून घ्या देशातील सद्यस्थिती... केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, या महामारीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 64 हजार 153 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 3 कोटी 38 लाख 73 हजार 890 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत, आतापर्यंत 113 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 67 लाख 82 हजार 42 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 113 कोटी 68 लाख 79 हजार 685 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.