मुंबई : राज्यात आज 4,654 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 301 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 55 हजार 451 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे. 


राज्यात आज 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 574 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,715 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (41), नंदूरबार (2),  धुळे (18), जालना (75), परभणी (23), हिंगोली (63),   नांदेड (29), अमरावती (96), अकोला (21), वाशिम (01),  बुलढाणा (47), यवतमाळ (05), नागपूर (69),  वर्धा (5), भंडारा (8), गोंदिया (2),  गडचिरोली (29) या सतरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 


 जळगाव, जालना, नांदेड, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया या  जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 32,56,024 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,47,442 (12.11 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,92,733 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,337  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 364 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 364 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,21,471 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2880 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1747 दिवसांवर गेला आहे.


देशात गेल्या 24 तासात 44 हजार 658 नव्या रुग्णांची भर


देशात सलग दुसऱ्या दिवशी 40 हजाराहून जास्त रुग्णसंख्येची भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 44 हजार 658 नव्या रुग्णांची भर पडली असून 496 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल 32 हजार 988 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी बुधवारी 46 हजार 164 रुग्णांची भर पडली होती तर 607 जणांचा मृत्यू झाला होता.  देशातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे केरळमध्ये वाढलेली रुग्णसंख्या. केरळमध्ये काल एकाच दिवशी तब्बल 30 हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली तर 162 जणांना जीव गमवावा लागला. केरळातील एकूण रुग्णसंख्या ही आता 39.13 लाख इतकी झाली आहे. तर