Maharashtra Budget Session 2024 : आजपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात होत आहे. आज सकाळी 11 वाजता विधान परिषद तर दुपारी 12 वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होईल. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालेल. या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांसाठी राज्य सरकारला घेरण्याची संधी असेल. विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.



27 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प



27 फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. त्यानंतर लगेच दुपारी दोन वाजता सन 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. अंतरिम अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, कर्जाचे हप्ते, व्याज तसेच लोकसभा निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लेखानुदान प्रस्ताव आणि लेखानुदान विनियोजन विधेयकाला मान्यता देण्यात येईल



मनोज जरांगे आरक्षण मुद्द्यावरून आक्रमक, अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता



राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच, असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. याचे पडसाद या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक होण्याचे चिन्हे आहेत. केंद्र सरकारने हटवलेली कांदा निर्यातबंदी, राज्याच्या अनेक भागात पाण्याची समस्या, भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांचे खून प्रकरण, पुण्यात सापडलेला हजारो कोटी रुपयांचा अंमली पदार्थ साठा यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे.


 


अधिवेशनाचे कामकाज कसे असेल?


विधिमंडळ सचिवालयाने अधिवेशनाचे कामकाज निश्चित केलंय
पहिल्या दिवशी विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण
त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर केला जाईल. 
भाजपचे आमदार राजेंद्र पटणी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात येणार
पहिल्या दिवशी शोक प्रस्तावानंतर कामकाज संपेल. 
अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. 
2023-24 च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहेत. 
त्यानंतर शासकीय कामकाजाला सुरुवात होईल.
त्यानंतर 27 फेब्रुवारीला पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन मंजूर केल्या जातील.
त्यानंतर दुपारी दोन वाजता 2024- 25 वर्षाचा अंतिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. 


 


हेही वाचा>>>


मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी