Gopichand Padalkar : येत्या 30 जानेवारीला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Graduate Constituency Election) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, याच दिवशी विविध गटातील पदवीधरांच्या परीक्षा होणार आहेत. एकाच दिवशी पदवीधरांच्या परीक्षा आणि निवडणूक आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळं तब्बल 10 हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. याच संदर्भात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला (Maharashtra State Election Commission) पत्र लिहलं आहे. या गंभीर मुद्द्याची दखल घेऊन, यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंती पत्राद्वारे पडळकर यांनी केली आहे. 


पदवीधरांच्या परीक्षा आणि निवडणूका एकाच दिवशी आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणूकांवर आणि पदवीधरांच्या भवितव्यावर याचा परिणाम होऊ शकतो असे पडळकरांनी म्हटलं आहे. अशा या गंभीर मुद्द्याची दखल आपण घ्याल, यावर आपण सकारात्मक तोडगा काढाल अशी अपेक्षा माझ्यासह 10 हजार पदवीधर मतदारांना करत असल्याचे पडळकरांनी म्हटलं आहे.   


पडळकरांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?


जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. या लोकशाहीत निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा परिस्थितीत कोण्याही व्यक्ती अथवा वर्गाला मतदानापासून वंचित रहावे लागणे त्याच्यावर अन्याय होण्यासारखे असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी पत्रात म्हटलं आहे. भारत हा युवकांचा देश आहे. या पदवीधर युवकांच्या भवितव्याची दिशा ठरवण्याचं काम 'पदवीधर' आमदार करतात. मात्र, तब्बल 10 हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. या गंभीर मुद्द्याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी हे पत्र मी लिहीत आहे. 


30 जानेवारीला गट 'अ' आणि 'ब' साठी विविध विभागांच्या परीक्षा


येत्या 30 जानेवारीला पदवीधर मतदार  संघाच्या निवडणूका आहेत. याच दिवशी नगरविकास, विधी व न्याय , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये , सार्वजनिक आरोग्य या विभागांच्या गट 'अ' आणि 'ब' साठी विविध विभागांच्या परीक्षा  होणार आहेत.  राज्यातील विविध ठिकाणी परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. शिवाय त्या दिवशी दोन सत्रात या परीक्षा पार पडणार आहेत. या सर्व कारणांमुळं तब्बल 10 हजारांहून अधिक उमेदवार 'पदवीधर' आमदार निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहणार असल्याचे गोपीचंद पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे. 


पदवीधरांच्या परीक्षा आणि निवडणुका एकाच दिवशी आल्यामुळं मोठा पेच 


लोकशाहीला अधिक बळकटी देण्याचं काम निवडणूका करत असतात. पदवीधरांच्या परीक्षा आणि निवडणुका एकाच दिवशी आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणुकांवर आणि पदवीधरांच्या भवितव्यावर याचा परिणाम होऊ शकतो. अशा या गंभीर मुद्द्याची दखल आपण घ्याल, यावर आपण सकारात्मक तोडगा काढाल अशी अपेक्षा माझ्यासह 10 हजार पदवीधर मतदारांना असल्याचे पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra News: राज्यातील 75 हजार पदांची नोकरभरती 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार, परीक्षा सुरळीत होण्यासाठी समिती स्थापन होणार