Mahaparinirvan Din LIVE Updates : आज 67 वा महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर

Mahaparinirvan Din LIVE : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Dec 2023 11:44 AM
Mahaparinirvaan : 'महापरिनिर्वाण' दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’ सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट! प्रसाद ओक मुख्य भूमिकेत

Mahaparinirvaan First Look Out : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या भावनांना ओघ आला, त्यांनी शोक व्यक्त केला, प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली. आज 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने, 'महापरिनिर्वाण' (Mahaparinirvaan) चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 




Mahaparinirvaan : 'महापरिनिर्वाण' दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’ सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट! प्रसाद ओक मुख्य भूमिकेत

Mahaparinirvan Din 2023 : पुढच्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंदु मिल स्मारकावर अभिवादन, महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की, पुढील महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर अभिवादन करू. पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर साजरा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Eknath Shinde: जगाला हेवा वाटेल असं स्मारक इंदू मिलवर तयार करणार : एकनाथ शिंदे

Eknath Shinde: लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे आले आहेत. सत्तेचा वापर परिवर्तनासाठी, समृद्धीचे दिवस आणण्यासाठी काम सुरू आहे. जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.  


 


Malegaon News:  मालेगावच्या चित्रकाराचे अनोखे अभिवादन..
Malegaon News:  नाशिकच्या मालेगाव येथील चित्रकार संदीप आव्हाड यांनी मेणबत्तीवर प्रतिकात्मक स्वरूपात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटत महामानवाला एक अनोखे अभिवादन केले आहे. 

 

 
नाण्यावर रेखाटले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, कला शिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन

Nashik News:  आज  6 डिसेंबर भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने 10 रुपयांच्या नाण्यावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटून महापरिनिर्वाण दिनानिमित्त कलाशिक्षक देव हिरे यांनी महामानवास अनोखे अभिवादन केले. दहा रुपयाच्या नाण्यावर ऍक्रेलीक रंगात ब्रशच्या सहाय्याने भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटण्यास साकारण्यास एक तास वीस मिनिटे इतका कालावधी लागला. ज्ञानाच्या या अथांग महासागरास या निमित्ताने महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

Washim News: वाशिममध्ये कॅन्डल मार्चचं आयोजन

Washim News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज वाशिम मध्ये कॅन्डल रॅली व अभिवादन  करण्यात आले. अभिवादन करण्यासाठी आज सकाळी कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले या वेळी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.

Nashik Candle March:  कॅन्डल मार्च काढून महामानवाला मानवंदना

Nashik Candle March:  महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या मनमाड शहरात कॅन्डल मार्च,  विविध पक्ष, संस्था, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते  कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले.  कॅन्डल मार्च काढून महामानवाला मानवंदना दिली.  

Dr. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिल्सच्या भूखंडावर बाबासाहेबांचं स्मारक, काम कधी पूर्ण होणार?

Dr. Babasaheb Ambedkar Statue : दादर येथील इंदू मिल्सच्या भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाचं काम कधी पूर्ण होणार आणि सर्वसामान्यांना हे स्मारक कधी पाहता येणार, याविषयी आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये उत्सुकता आहे. 


Dadar Chaityabhoomi: महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अभिवादन करणार

Dadar Chaityabhoomi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे.  महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अभिवादन करणार आहेत. 

Mahaparinirvan Din Holiday:  महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शासकीय सुट्टी जाहीर

Mahaparinirvan Din Holiday:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व शासकीय कार्यालयं राहणार बंद राहणार आहेत. 

पार्श्वभूमी

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना 'भारतीय राज्यघटनेचे जनक' म्हणूनही ओळखलं जातं. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला.


भारतातील वर्ग लढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले होते. 


स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली.  बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश सरकारमध्ये मजूर मंत्री होते. त्यांनी त्या कालावधीत भारतीय कामगारांसाठी अनेक मोलाचे कायदे करून घेतले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर  (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप 1928-1934 या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप सात वर्ष सुरू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला. 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले. 10 जानेवारी 1938 रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली 25 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.


बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आदी पाक्षिके, वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली होती. त्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे प्रश्न उचलून धरले. अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय,1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याच्या दोन महिन्याच्या आत त्यांचे महापरिनिर्वाण झाले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.