लिंगायत समाजाला संविधानिक आणि अल्पसंख्यांकाचा दर्जा द्यावा, तसेच लिंगायत समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण द्यावे अशा मागण्या समाजाने सभेत मांडल्या.
तसेच 31 डिसेंबरपर्यंत आरक्षणाच्या प्रश्नाबाबात जर सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तर 26 जानेवारीनंतर अन्नत्याग करण्याचा इशाराही लिंगायत संघर्ष समितीतर्फे देण्यात आला.
आरक्षणासाठी एकिकडे धनगर समाज आक्रमक झालेला आहे. त्यात आता लिंगायत समाजानेही त्यांची आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.