निर्माण चौकातील ओअॅसिस अपार्टमेन्टमध्ये तब्बल 5 फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. बंद फ्लॅट हेरुन, इमारतीत सीसीटीव्ही आणि वॉचमन नसल्याची रेकी करुन चोऱ्या करणाऱ्या या टोळीने पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. घरातील सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या या चोरट्यांचा सध्या शोध सुरु आहे.
घरफोड्या टोळीचं धाडस तर इतकं की एकाच अपार्टमेंटमध्ये ते किमान 5 ते 6 फ्लॅट फोडतात. दिवसा ढवळ्या चोऱ्या होत असल्यानं नागरिक हैराण झाले आहे.
या टोळीची नागरिकांमध्ये चांगलीच दहशत परसली असताना पोलिस मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.