jalyukt shivar : जलयुक्त शिवार घोटाळ्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह दोन कर्मचार्‍यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्यात मागच्या महिन्यामध्ये कृषी विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा चार जणांना परळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे, अमोल कराड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.


दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांपैकी शिवाजी हजारे आणि विजयकुमार भताने हे दोघेजण निवृत्त तालुका कृषी अधिकारी आहेत. तर कराड आणि जंगमे हे सध्या कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.


2018 मध्ये जलयुक्त शिवारच्या कामामध्ये घोटाळ झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते. जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचे हे प्रकरण आहे. मागच्या महिन्यामध्ये याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. तसेच कंत्राटदारांकडे अडकलेल्या 90 लाख रुपयांची रिकव्हरी करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. त्यानंतर ता पुन्हा चार जणांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. जलयुक्त शिवार घोटळ्याच्या चौकशीला जरी उशीर झाला असला तरी आता मात्र, या तपासाला वेग आला आहे.


याप्रकरणी परळी पोलीस स्टेशनमध्ये दोन कोटी 41 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आरोपींमध्ये कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी आणि कंत्राटदारांच्या नावाचा समावेश होता.  बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांना 90 लाख रुपये वसूल करण्याचे औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकानी आदेश दिले होते. या आदेशा सोबतच पोलिसांनी सुद्धा अटकेची कारवाई सुरु केली आहे. काँग्रेसचे वसंत मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजना मध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मागच्या अनेक दिवसापासून याची चौकशी सुरू आहे. बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांना 90 लाख रुपये वसूल करण्याचे औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकानी आदेश दिले होते या आदेशा सोबतच पोलिसांनी सुद्धा अटकेची कारवाई सुरू केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: