Maharashtra Political Crisis :  मुख्यमंत्री म्हणजेच "आमचा विठ्ठल" चांगला आहे. मात्र त्यांच्या अवतीभवतीचे बडवे वाईट आहेत. शिवसेनेत याच बडव्यांमुळे फूट पडली आहे. हे बडवे मुख्यमंत्र्यांना कोणाशी भेटू देत नाहीत, कामे होऊ देत नाहीत, असे म्हणत विदर्भातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्र्यांचे सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर निशाणा साधलाय.  


"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अवतीभवतीचे वातावरण आणि माणसं लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे. आमचा विठ्ठल चांगला आहे, मात्र त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला घेरलंय. त्या बडव्यांमुळेच मातोश्री बदनाम होत आहे, अशी टीका आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे. 


भुयार म्हणाले. "जे आमदार नाराज होऊन गेले आहेत ते याच बडव्यांमुळे नाराज होऊन गेले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, त्यांचा वेळ मिळत नाही. त्यामागचं प्रमुख कारण हे बडवे आहेत."


दरम्यान, हे बडवे कोण याबद्दल देवेंद्र भुयार स्पष्ट काही बोलले नसले तरी मिलिंद नार्वेकर यांच्यावर त्यांनी निशाणा साधल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. "नार्वेकर यांची क्षमता काय, कौशल्य काय हे सर्वांना माहीत आहे. तेच आमदारांना आणि नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देत नाही असा आरोप भुयार यांनी केलाय. 


'बंड केलेले आमदार परत येतील'
महाविकास आघाडी सरकारवरचे संकट लवकर दूर होईल आणि सरकार वाचेल. शिवसेनेतील बंड करून गेलेले आमदार दोन-तीन दिवसात परत येतील असा विश्‍वास देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केला आहे. 


देवेंद्र भुयार मुंबईकडे रवाना
देवेंद्र भुयार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मानले जात आहे. अजित पवार यांच्या सूचनेनुसार ते तातडीने आज मुंबईला निघाले आहेत.  


महत्वाच्या बातम्या


Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार, कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप 


Uddhav Thackeray : कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला..., 'वर्षा'ते 'मातोश्री' दरम्यान शिवसैनिकांची तुफान गर्दी आणि घोषणाबाजी