India Weather Update : सध्या उत्तर भारतात तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे उत्तर भारतात नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा हवामानात बदल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंडमध्ये पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे किमान तापमानात घट होणाार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात देखल किमान तापमानात वाढ होत आहे. तापमानाचा पारा 30 ते 35 अंशावर गेला आहे.


महाराष्ट्र


महाराष्ट्रात हळूहळू तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिवस आणि रात्रीतील तापमानात तफावत जाणवत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, येत्या एक ते दोन दिवसात राज्यात तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


दिल्ली


राजधानी दिल्लीत सध्या लोक सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहेत. आज तापमानात पूर्वीच्या तुलनेत वाढ होणार असली तरी यासोबतच थंड वारेही वाहत असल्याचे दिसून येत आहे. आज ढगाळ वातावरण राहणार आहे. आज दिल्लीत कमाल तापमान 28 आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस दिल्लीत असेच वातावरण पाहायला मिळणार आहे.


उत्तर प्रदेश


उत्तर प्रदेशातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापमान 11 ते 15 अंशांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवस राज्यात हवामान निरभ्र असेल, मात्र थंड वारेही वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



बिहार


बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आजही ढगाळ वातावरण राहील. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाटणासह अनेक शहरांचे कमाल तापमान 25 अंश तर किमान तापमान 11 अंश राहण्याचा अंदाज आहे. राज्यात पुढील काही दिवस असेच वातावरण राहणार आहे.


राजस्थान


राजस्थानमध्ये तापमनात वाढ होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील जयपूर आणि जोधपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 16 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.


पंजाब


पंजाबमध्ये हवामान स्वच्छ राहण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज राज्यात ढगाळ वातावरण राहील. आज कमाल तापमान 25 अंश तर किमान तापमान 12 अंश राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, 26 फेब्रुवारीला राज्यातील अनेक भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


जम्मू आणि काश्मीर


जम्मू-काश्मीरच्या काश्मीर विभागात आजही पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. जम्मू विभागात आज पाऊस पडणार आहे. आज कमाल तापमान 23 अंश तर किमान तापमान 14 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. IMD ने जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये संपूर्ण आठवडा पावसाचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे किमान तापमानात घट होऊ शकते.


उत्तराखंड


गेल्या मंगळवारी उत्तराखंडमधील उंच भागात बर्फवृष्टी झाली. त्यानंतर अनेक भागात पावसाचीही नोंद झाली. त्याचवेळी हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस पडू शकतो, त्यामुळे किमान तापमानात घट होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 14 अंशांपर्यंत, तर किमान तापमान 2 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.


महत्त्वाच्या बातम्या: