गौतम नवलखा यांचा अटकेपासूनचा दिलासा 2 मे पर्यंत कायम, राज्य सरकारचा विरोध
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 26 Apr 2019 05:14 PM (IST)
शहरी नक्षलवाद आणि कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी गौतम नवलखा यांना अटकेपासून दिलेला दिलासा हायकोर्टाने 2 मेपर्यंत कायम ठेवला आहे.
मुंबई : शहरी नक्षलवाद आणि कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी गौतम नवलखा यांना अटकेपासून दिलेला दिलासा हायकोर्टाने 2 मेपर्यंत कायम ठेवला आहे. पुणे पोलिसांनी यासंदर्भात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे. परंतु राज्य सरकारने नवलखा यांच्याकडून गुन्हा रद्द करण्यासाठी दखल करण्यात आलेल्या याचिकेला विरोध केला आहे. नवलखा यांना दिलेला दिलासा सतत कायम होत असल्याने तपासयंत्रणेच्या कारवाईत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे कोर्टाने नवलखा यांना अटकेपासून दिलेला दिलासा काढून घ्यावा, अशी मागणी सरकारी वकील अरूणा पै यांनी कोर्टाकडे केली आहे. याप्रकरणी सरकारकडे सबळ पुरावे आहेत, असा राज्य सरकारचा दावा आहे. हिंसाचाराला वर्ष लोटले, सुरक्षा चोख, सलोख्याचं काय? |स्पेशल रिपोर्ट | कोरेगाव भीमा | एबीपी माझा कोरेगाव-भीमा हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरुन गौतम नवलखा यांच्यासह तेलुगू लेखक वारावरा राव, सामाजिक कार्यकर्ते अरुण परेरा, वर्नोन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज आणि प्राचार्य आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तसेच याप्रकरणी त्यांना नजरकैदेतही ठेवण्यात आले होते. सबंधित बातम्या नवी दिल्ली | गौतम नवलखा यांच्या सुटकेविरोधात महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टात धाव नवी दिल्ली | कोरेगाव भीमा संबंध - गौतम नवलखा यांच्या मुक्ततेचे कोर्टाचे आदेश आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना हायकोर्टाचा दिलासा